मुंबई : अभिनेत्री कंगना रानौतच्या जुहू येथील कार्यालयावर मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून कारवाईला आज सकाळी सुरुवात करण्यात आली होती. कंगनाच्या कार्यालयामधील तळमजल्यावर असणारं अनधिकृत बांधकाम तोडलं गेलं आहे. यानंतर कंगना रणौत भावुक झाली असून, तिने ट्विटरवरून राज्य सरकारसह मुंबई महापालिकेवर घणाघात सुरूच ठेवला आहे.
आता अभिनेत्री कंगना रनौतला मुंबई उच्च न्यायालयाने काहीसा दिलासा दिला आहे. कंगनाच्या मुंबईतील कार्यालयातील अनधिकृत बांधकामावरील बीएमसीच्या कारवाईला तूर्तास स्थगिती दिली आहे. उद्या दुपारी तीन वाजता पुन्हा या प्रकरणी सविस्तर सुनावणी होणार आहे. त्यावेळी कंगना आणि बीएमसी आपापली बाजू हायकोर्टात मांडतील.
तर, माझ्या घरात कोणतंही अवैध बांधकाम नाही. तसंच कोरोना काळात 30 सप्टेंबरपर्यंत कोणत्याही तोडकामावर सरकारने बंदी घातली आहे. फॅसिझम असंच काहीसं असंच असतं, असं ट्वीट कंगना रनौतने केलं आहे. कंगनाला सद्या सामोरे जावे लागत असलेल्या कठीण काळात सोबत असल्याची भूमिका भाजपचे दिग्गज नेते व खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी, ” कंगनाला विश्वास ठेवण्यास सांगा, तिच्या या कठीण काळात आम्ही सोबत आहोत” असे ट्विट स्वामींनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या:-
कंगना बद्दल प्रतिक्रिया देऊ नका , मातोश्रीवरून आदेश
शिर्डीचे साई मंदिर उघडण्याबाबत तिरुपती देवस्थानच्या अध्यक्षांनी दिल्या टिप्स!
स्कूल व्हॅनचे रुग्णवाहिकेत रुपांतर, नागपुरात होणार हा प्रयोग
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

