🕒 1 min read
जळगाव:- विधानपरिषदेवरील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत भाजपचा पराभव हा फाजिल नेतृत्वामुळे झाला. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, ही भावना अजून गेली नाही अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे.
राज्यातील तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघाच्या निकालातून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीला एकजुटीचे फळ मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढल्याने भाजपला जबरदस्त धक्का बसला आहे. कारण, भाजपला औरंगाबादसह हक्काचा मानला जाणारा पुणे आणि नागपूर पदवीधर मतदारसंघही गमवावा लागला आहे. तर पुणे शिक्षक मतदारसंघातही राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी ठरलाय. या विजयानंतर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे.
अहम्-पणाचा पराभव झाला. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन ही भावना अजून गेली नाही. पुणे आणि नागपूरसारखा परंपरागत मतदारसंघ भाजपच्या हातून गेला. लोकांचा आता भारतीय जनता पार्टीवरील विश्वास कमी होत चालला आहे आणि महाविकास आघाडीवर विश्वास वाढला आहे अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.
महत्वाच्या बातम्या
- दोन दिवसांचे अधिवेशन मलाही मान्य नाही; नाना पटोलेंची जाहीर नाराजी!
- हैदराबाद महापालिकेत भाजपचं ‘भाग्य’ पालटलं ? दक्षिणेत जम बसवण्यासाठी हा ठरू शकतो मैलाचा दगड…
- ‘भ्रमाचा फुगा फुटला; धुळे-नंदुरबार पण आयात केलेला निकाल’
- चंद्रकांत पाटील विनोदी आहेत जास्त लक्ष देऊ नका – शरद पवार
- पुणे पदवीधर निवडणूकीत अभिजित बिचुकलेंनी घेतली ‘एवढी’ मते
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
