Share

‘आता यांच्या पोरांचे लग्न देखील आपल्याच पैशातून होतील’’, नितेश राणेंचा घणाघात

Published On: 

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अभिनेत्री कंगणा यांच्यातील राजकीय वादात कंगणा रणौतच्या कार्यालयात हतोडा चालवला गेला असून हि कारवाई मुंबई महानगरपालिका (बीएमसी) द्वारे करण्यात आली होती. अभिनेत्री कंगनाच्या अवैध बांधकामप्रकरणी मुंबई महापालिका आणि कंगनामध्ये न्यायालयीन वाद सुरू आहे.

अभिनेत्री कंगना रनौतला मुंबई उच्च न्यायालयाने काहीसा दिलासा दिला होता. कंगनाच्या मुंबईतील कार्यालयातील अनधिकृत बांधकामावरील बीएमसीच्या कारवाईला स्थगिती दिली होती. त्यांनतर याची कारवाई मुंबई उच्च न्यायालयात सुरु आहे.

कंगणा प्रकरणात पालिकेने न्यायालयात नेमलेल्या वकिलाला आतापर्यंत किती मानधन देण्यात आले, याची माहिती शरद यादव या माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी पालिकेकडे मागितली होती. पालिकेने दिलेल्या उत्तरात २२ सप्टेंबरपर्यंत २२ लाख ५० हजार तर ७ ऑक्टोबरपर्यंत ६० लाख रुपये, असे एकूण ८२ लाख ५० हजार दिले असल्याचे पालिकेने स्पष्ट केले.

यावरूनच आता भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी राज्यसरकार आणि शिवसेनेवर सडकून टीका टीका केली आहे. ‘मुंबईकर कर हे पेंग्विन आणि कंगना राणावतच्या केसमधील वाकीलासाठी देतात आता यांच्या मुलांचे लग्न देखील आपल्याच पैशातून होतील’ अस ट्विट करत नितेश राणेंनी घणाघात केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!