🕒 1 min read
मुंबई : मुकेश अंबानी यांच्या घरासमोरील स्फोटक प्रकरणात सुरु असलेल्या चौकशीत प्रत्येक दिवशी नवनवीन आणि धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. मुंबईमध्ये गाडीत स्फोटक सापडल्या प्रकरणी मुंबई पोलीस दलाचे निलंबित अधिकारी सचिन वाझे यांना राष्ट्रीय सुरक्षा तपास यंत्रणा अर्थात एनआयएने (NIA) अटक केली आहे. सचिन वाझेंना २५ मार्च पर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आली असून या प्रकरणामुळे राजकीय क्षेत्रात देखील मोठी खळबळ उडाल्याचे दिसून आलं आहे.
मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केलेले पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट सचिन वाझे यांना दिलं होतं, असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी केला आहे. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत पत्र लिहिलं आहे. एका वृत्तवाहिनीने हा दावा केला आहे.
माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून हा दावा केला आहे. या पत्रात परमबीर सिंग म्हणतात, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना महिन्याला १०० कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिलं होतं. महिन्याला इतकी मोठी रक्कम बार, रेस्टॉरंट आणि अन्य संस्थांकडून वसुली करायची होती. असा धक्काद्दायक खुलासा माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेला आहे.
यावरून आता राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. विरोधकांनी सरकारला अक्षरशः धारेवर धरलं आहे. भाजपच्या अनेक नेत्यांनी अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आता अनिल देश्मुख्यांच्या बचावात मैदानात उतरले आहेत.
पोलीस आयुक्त परमबीर सिंग अचानक गृहमंत्र्यांवर जे खोटे आरोप करायला लागलेत यावरून भाजपाने केंद्रीय यंत्रणेचा यावेळीही गैरवापर करून दडपशाही मार्गाने सिंगाना पत्रव्यवहार करायला भाग पाडलय . भाजपा सत्तेसाठी कुठल्याही स्तरावर जाऊ शकते हे महाराष्ट्राला माहित आहे. सावधान.@TV9Marathi
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) March 20, 2021
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करत अनिल देशमुखांचा बचाव करत भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. ‘पोलीस आयुक्त परमबीर सिंग अचानक गृहमंत्र्यांवर जे खोटे आरोप करायला लागलेत यावरून भाजपाने केंद्रीय यंत्रणेचा यावेळीही गैरवापर करून दडपशाही मार्गाने सिंगाना पत्रव्यवहार करायला भाग पाडलय. भाजपा सत्तेसाठी कुठल्याही स्तरावर जाऊ शकते हे महाराष्ट्राला माहित आहे. सावधान’. अस ट्विट करत अमोल मिटकरी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा, दरेकरांची मागणी
- ‘अब बात निकल ही गई है तो फिर दूर तलक जायेगी’, चित्रा वाघांचा ठाकरे सरकारवर निशाणा
- मोठी बातमी :आदित्य ठाकरेंना यांना कोरोनाची लागण
- एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी लॉकडाउनमध्येही धावणार स्मार्ट सिटी बस
- ‘नितीन राऊत साहेब…उच्च राहणीमानाचा खर्च स्वतः च्या खिशातून करा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

