Share

भाजप नेते पूरग्रस्तांसाठी तात्काळ केंद्राने मदत दिली असल्याचा संभ्रम निर्माण करत आहेत – राष्ट्रवादी 

Published On: 

🕒 1 min read

मुंबई   – भाजपचे नेते लोकांची दिशाभूल करुन पूरग्रस्तांसाठी तात्काळ केंद्राने मदत दिली असल्याचा संभ्रम निर्माण करत आहेत. त्यामुळे लोकांनी कृपया यावर विश्वास ठेवू नये असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राज्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केले आहे.केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी मंगळवारी लोकसभेत उत्तर देत असताना महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ७०१ कोटींची मदत जाहीर केली असे वक्तव्य केले होते. मात्र ही मदत २०२० साली झालेल्या नैसर्गिक अतिवृष्टीबाबत आहे असे महेश तपासे यांनी स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्र सरकारने त्यावेळी केंद्राकडे ३ हजार ७२१ कोटींची मदत मागितली होती. त्यापैकी केवळ ७०१ कोटी मदत केंद्राने आता दिली आहे. ही विद्यमान पूरपरिस्थितीची मदत नाही असेही महेश तपासे यांनी ठणकावून सांगितले आहे.

केंद्रसरकारकडे ज्यावेळी ३ हजार ७०१ कोटींची मागणी केली त्याचवेळी महाविकास आघाडी सरकारने राज्यातील ग्रामीण भागातील पूरग्रस्तांसाठी ४ हजार ३७५ कोटींची मदत दिल्याचेही महेश तपासे यांनी स्पष्ट केले. भाजपचे नेते लोकांची दिशाभूल करुन पूरग्रस्तांसाठी तात्काळ केंद्राने मदत दिली असल्याचा संभ्रम निर्माण करत आहेत असा आरोपही महेश तपासे यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!