Share

Agneepath Scheme: ‘अग्निपथ’ योजनेविरोधात आज बिहार बंद

Published On: 

बिहार: देशात सध्या अग्निपथ योजनामुळे वातावरण चांगलेच तापताना दिसून येत आहे. केंद्र सरकारने अग्निपथ भरती  योजनेअंतर्गत तरुणांना केवळ चार वर्षांसाठीच सैन्यात भरती केली जाणार असल्याचे म्हटले आहे. देशातील तरुणांनी या योजनेला कडाडून विरोध करत विविध ठिकाणी आंदोलन छेडले आहे. आता याविरोधात बिहारने आज बंद पुकारला आहे.

बिहारमध्ये आंदोलकांनी १२ रेल्वे जाळल्या असून या योजनेविरोधातील १३ राज्यांत प्रचंड विरोध केला जात आहे. त्यात बिहार आणि तेलंगणध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. आता काही विद्यार्थी संघटनांनी आज बिहार बंद पुकारला असून या बंदला  लालू प्रसाद यादव यांचा पक्ष आरजेडीने समर्थन दिले आहे. तसेच बिहारमध्ये काही जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद केली असून  रोजगार संघर्ष संयुक्त मोर्चा आणि सैन्य भरती जवान मोर्चा यांनी आज बिहार बंद पुकारला आहे.

दरम्यान सैन्यदलांत १७.५ ते २१ वर्षे या वयोगटातील तरुणांना अग्निवीर म्हणून सेवेची संधी मिळणार असून तरुणांचा रोष पाहता केंद्र सरकारने वयोमर्यादा २१ वरुन २३ केली आहे. चार वर्षांच्या कालावधीसाठी तरुणांना यात समाविष्ट केले जाणार आहे. तसेच महिन्याला ३० ते ४० हजार रुपये वेतनही मिळणार आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!