🕒 1 min read
मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाडवा मेळाव्यात मशिदीसमोर मोठ्या आवाजात हनुमान चालीसा वाजवण्याची भूमिका घेतली होती. याला भाजपनेही पाठींबा दर्शवला आहे. तर खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठन करण्याचा इशारा दिला होता. याप्रकरणी सध्या राणा दाम्पत्य जेल मध्ये आहेत. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवरच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी ट्वीट करत विरोधी पक्षावर निशाणा साधला आहे.
“राजकारणात सध्या एक नवा ट्रेंड सुरु झाला आहे. उन्मादाचा फायदा उठवता यावा म्हणून बडे राजकीय पक्ष धार्मिक भावना भडकविण्याचे टेंडर छोट्या पक्षांना देत आहेत.”, असा टोला नाना पटोले यांनी ट्वीट करत लगावला आहे.
राजकारणात सध्या एक नवा ट्रेंड सुरु झाला आहे. उन्मादाचा फायदा उठवता यावा म्हणून बडे राजकीय पक्ष धार्मिक भावना भडकविण्याचे टेंडर छोट्या पक्षांना देत आहेत
— Nana Patole (@NANA_PATOLE) April 25, 2022
दरम्यान कालच भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला. यात ते किरकोळ जखमीही झाले आहेत. या प्रकरणीच सोमय्या आणि भाजप नेत्यांचे मंडळ केंद्रीय गृहसचिवांची भेट घेण्यासाठी दिल्ली गेले आहेत. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनीही केंद्रीय गृहसचिवांना पत्र लिहिले आहे. त्यामुळे भाजपने राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असल्याचे कारण देत राष्ट्रपती राजवटीची मागणी केली आहे. यामुळे राज्यातील राजकीय संघर्ष अधिकच पेटताना दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “प्रत्येकाने धार्मिक भावना आपल्या मनात ठेवाव्यात”- शरद पवार
- …तर अशा बैठकीत जाऊन फायदा काय?- देवेंद्र फडणवीस
- ‘लिव इन रिलेशनशिप मध्ये बलात्कार नसतो’, गणेश नाईकांना करणी सेनेचा पाठींबा
- “राजकारणासाठी हनुमानाचा वापर करणे..”, फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊतांचे प्रत्युत्तर
- “मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावरच मुंबईत हल्ले”; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
