Share

#भंडारा दुर्घटना : दोषींना कडक शासन करणार, कुणाचाही मुलाहिजा ठेवणार नाही- अजित पवार

Published On: 

🕒 1 min read

भंडारा :- महाराष्ट्रातील भंडारा जिल्हा रुग्णालयात शुक्रवारी रात्री उशिरा नवजात बालकांच्या दक्षता विभागाला लागलेल्या आगीत होरपळून १० बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

नवजात बालकांचं वय एक महिने ते तीन महिन्यांचं होतं, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. वार्डमध्ये एकूण १७ बालकं होती त्यातील सात बालकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं. परंतु, १० बालकांचे प्राण मात्र वाचवले जाऊ शकले नाहीत. या दुर्दैवी घटनेमुळे अवघा देश हादरला आहे. या घटनेवर विविध स्तरातून प्रतिक्रिया येत असून दोषी असणाऱ्या व्यक्तींना कठोर शिक्षा दिली जावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

दरम्यान, या घटनेवर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. भंडारा दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, दगावदेल्या मुलांच्या नातेवाईकांना ५ लाख रूपयांची मदत देण्यात येईल, आरोप होत आहेत विरोधकांकडून त्यातले तथ्य तपासून पाहू, दोषींना कडक शासन करणार असून मुलाहिजा ठेवणार नाही, असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही या दुर्दैवी घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. ‘भंडारा जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात शॉर्टसर्किटमुळे आग लागून 10 बालकांचा मृत्यू झाला. ही घटना अत्यंत दु:खदायक आणि व्यथित करणारी आहे. या घटेनमध्ये बळी ठरलेल्या सर्व कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे. या घटनेची तत्काळ चौकशी व्हायला हवी. तसेच दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी’, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!