🕒 1 min read
भंडारा :- महाराष्ट्रातील भंडारा जिल्हा रुग्णालयात शुक्रवारी रात्री उशिरा नवजात बालकांच्या दक्षता विभागाला लागलेल्या आगीत होरपळून १० बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
नवजात बालकांचं वय एक महिने ते तीन महिन्यांचं होतं, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. वार्डमध्ये एकूण १७ बालकं होती त्यातील सात बालकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं. परंतु, १० बालकांचे प्राण मात्र वाचवले जाऊ शकले नाहीत.
या दुर्दैवी घटनेमुळे अवघा देश हादरला आहे. या घटनेवर विविध स्तरातून प्रतिक्रिया येत असून दोषी असणाऱ्या व्यक्तींना कठोर शिक्षा दिली जावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
This is heart breaking and so so sad. No parent deserves to go through this. Prayers, strength and deepest condolences to the families who lost their child. There needs to be an inquiry, if it is due to negligence the guilty must be brought to justice. #MaharashtraHospitalFire https://t.co/M1NZUoIPoy
— Riteish Deshmukh (@Riteishd) January 9, 2021
दरम्यान, या घटनेवर आता अभिनेता रितेश देशमुख याने प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये म्हटले की,ही घटना हृदय पिळवटून टाकणारी आहे. अत्यंत दु:खद. कोणत्याच पालकांना हे दु:ख पाहायला लागू नये. ज्यांनी आपले बाळ गमावले आहे. त्या सर्व कुटुंबियांना सामर्थ्य मिळो. माझी प्रार्थना त्यांच्यासोबत आहे. या प्रकरणी चौकशी करण्याची गरज आहे. निष्काळजीपणामुळे ही घटना घडली असल्यास दोषींवर शिक्षा व्हायला हवी.
महत्वाच्या बातम्या
- भंडारा शासकीय रुग्णालयाच्या नवजात बालक अतिदक्षता कक्षात आग; 10 बालकांचा मृत्यू
- मनपाच्या विद्यार्थिनींची अंतरिक्षातील भरारी सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायक
- भंडाऱ्यातील दुर्दैवी घटनेने राहुल गांधी हळहळले
- #भंडारा दुर्घटना : भविष्यात अशा घटना घडणार नाहीत याची दक्षता घेतली जाईल : टोपे
- भंडारा शासकीय रुग्णालयाच्या नवजात बालक अतिदक्षता कक्षात आग; 10 बालकांचा मृत्यू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

