🕒 1 min read
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) पंजाब दौऱ्यावेळी त्यांचा ताफा निदर्शकांनी तब्बल १५ ते २० मिनीटे अडवल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव पंतप्रधांनांना आपला दौरा रद्द करावा लागला. मोदींचा ताफा जिथे थांबला तिथून पाकिस्तान फक्त २० किमी अंतरावर होते. त्यामुळे हा कॉंग्रेसचा घातपाताचा डाव होता, असा आरोप भाजपने केला आहे. आता असे असतानाच काँग्रेस नेते भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी ट्वीट करत मोदींना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.
‘बिन बुलाये पाकिस्तान्यांसोबत बिर्याणी खायला भीती नाही वाटत मग आपल्याच शेतकऱ्यांसोबत १५ ते २० मिनिटे थांबायला भीती का वाटते?’ असा खोचक सवाल करत भाई जगताप यांनी मोदींना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.
बिना बुलाये पाकिस्तानियों के बीच बिरयानी खाने में डर नही लगा…
अपने किसानों के बीच १५ मिनट रहने में डर क्यों लगता हैं??
— Bhai Jagtap – भाई जगताप (@BhaiJagtap1) January 7, 2022
दरम्यान भाजपने केलेल्या आरोपाचे कॉंग्रेसने खंडन केले आहे. पंतप्रधान मोदींचा निदर्शकांमुके ताफा १५ ते २० मिनीटे अडकला. असा आरोप भाजपने केला आहे. मात्र कॉंग्रेसने या ठिकाणाचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यात निदर्शक नाही तर भाजप समर्थकांचा गोंधळ उडाल्याचे दिसून येत आहे. यावरूनच कॉंग्रेसने भाजपचा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. भाजप समर्थक भाजपचे झेंडे घेऊन मोदींच्या नावाचा जयघोष करतानाचा हा व्हिडिओ आहे. त्यामुळे भाजपने पंजाबच्या जनतेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, मात्र पंजाब माफ करणार नाही. असा इशाराही काँग्रेसने आपल्या अधिकृत काँग्रेस पेजवर ट्वीट करत दिला आहे.
पाहा तो व्हिडिओ-
महत्वाच्या बातम्या:
- ‘मोदींचे ढोंग जनतेसमोर आले’, सचिन सावंत यांचा टोला
- अभिनेत्री स्वरा भास्करची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह ; पोस्ट झाली व्हायरल
- पंतप्रधानांच्या सुरक्षेचा कांगावा करणाऱ्या गोदी मीडिया आणि भाजपचा प्रॉपगंडा फुटला- नाना पटोले
- “शिवसेनेचा गोव्यात एक सरपंच सुद्धा नाही”, प्रमोद सावंत यांची टीका
- ‘मुंबईत मिनी लॉकडाऊन लागणार?’, पेडणेकरांनी दिले उत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
