पंढरपूर : श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी भगीरथ भारत भालके यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. आमदार भालके यांचा मुलगा भगीरथ भालके यांना ही संधी देण्यात आली.
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते.दरम्यान, सहाय्यक निबंधक एस. तांदळे यांनी कारखाना स्थळावर संचालक मंडळाच्या बैठकीचे आयोजन केले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूरचे आमदार भारत भालके यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. त्यांच्या जाण्याने राष्ट्रवादी काँग्रेससह सोलापूर जिल्ह्यातील नेतृत्वाचं मोठं नुकसान झालं आहे. कोरोनामधून बरे झाल्यानंतर त्यांना पुन्हा त्रास सुरु झाल्यानंतर पुण्यातील रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. मात्र, कुस्तीतून वर आलेला हा पट्ठ्या जीवनातील लढाईत हरला.
भारत भालके हे 1992 साली ते तालुका स्तरावरील राजकारणात सक्रिय झाले. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून त्यांनी कारकिर्दीला सुरुवात केली. 2002 पासून त्यांनी कारखान्याच्या अध्यक्षपदावर कायम वर्चस्व ठेवले. भारत भालके यांनी सलग 18 वर्षे विठ्ठल कारखान्याची धुरा सांभाळली होती.
महत्वाच्या बातम्या
- मालमत्ता खरेदीदारांना खुशखबर ! मुद्रांक शुल्कामधील सवलत चार महिन्यांनी वाढली…
- खगोलप्रेमींना पर्वणी ! आज २० वर्षांनंतर गुरु आणि शनी येणार अत्यंत जवळ
- पंतप्रधान मोदींच्या ‘मन की बात’च्या वेळी थाळीनाद करा, शेतकऱ्यांचे आवाहन
- दुखापतग्रस्थ मोहम्मद शमीच्या जागी लागणार ‘या’ युवा खेळाडूची वर्णी
- भाजपने प.बंगालमध्ये दोन अंकी जागा जिंकल्या तर मी ट्विटर वापरणं सोडून देईन : प्रशांत किशोर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
