🕒 1 min read
मुंबई : वेदांता ग्रुप व फोक्सकॉनचा सेमीकंडक्टर चिप निर्मितीचा प्रकल्प गुजरातला गेला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात याचे पडसाद उमटलेले पाहण्यास मिळाले. यावरून राज्यातील अनेक रायकीय नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अशातच काँग्रेस विधिमंडळाचे पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
बाळासाहेब थोरात यांचे वक्तव्य-
महाराष्ट्र हे गुंतवणुकदारांच्या पसंदीचे पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे. महाविकास आघाडीच्या सरकारनेही अडीच वर्षांच्या काळात मोठी गुंतवणूक राज्यात आणली व त्यातून राज्यातील लाखो तरुणांच्या हाताला काम दिले. मात्र महाविकास आघाडीचे सरकार जाताच अडीच महिन्यात असे काय झाले की, महाराष्ट्रात 1 लाख 58 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणारा फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेला. महाविकास आघाडी सरकारने या प्रकल्पावर जवळपास 90 टक्के चर्चाही केली होती. त्यामुळे यामागचे नेमके गौडबंगाल काय हे जनतेला कळाले पाहिजे, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. बाळासाहेब थोरात यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवदर्शनात व्यस्त-
पुढे ते असंही म्हणाले की, गुजरातला गेलेला प्रकल्प राज्यातील 1 लाख लोकांना रोजगार निर्माण करून देणारा होता. एवढा मोठा प्रकल्प गुजरातला गेल्याने महाराष्ट्रातील तरुणांनी काय फक्त दहिहंड्याच फोडत बसायचे काय?, असा सवाल बाळासाहेब थोरात यांनी राज्य सरकारला केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सत्कार सोहळे करण्यात व देवदर्शनात व्यस्त आहेत. यासगळ्यातून त्यांना राज्य कारभार करण्यास वेळ मिळत नसावा पण थोडे लक्ष राज्याच्या कामकाजात दिले असते तर एवढा मोठा प्रकल्प महाराष्ट्राच्या हातून गेला नसता.
मुंबई व महाराष्ट्राचे महत्व कमी करण्यासाठी भारतीय जनता पक्ष व केंद्रातील भाजप सरकार सातत्याने प्रयत्न करत आले आहेत. तसेच, हा प्रकल्प गुजरातमध्ये जात असल्याची कोणतीच माहिती राज्य सरकारला समजली नाही का?. त्याचप्रमाणे हा प्रकल्प महाराष्ट्रातच रहावा यासाठी शिंदे फडणवीस सरकारने काय प्रयत्न केले?, असे अनेक प्रश्न याठिकाणी थोरात यांनी उपस्थित केले आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Raj Thackeray | 1 लाख 58 हजार कोटींचा प्रकल्प गुजरातला; राज ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले…
- Eknath Shinde । पुणे-नाशिक रेल्वे मार्गासह अन्य प्रकल्पांना गती द्या; मुख्यमंत्र्यांचे ‘महारेल’ला निर्देश
- Shambhuraj Desai | सातारा जिल्ह्यातील लम्पी प्रादुर्भावाचा मंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला आढावा
- Chandrakant Patil | राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांची संख्या पाच लाख होणार – चंद्रकांत पाटील
- Uday Samant। 1. 54 लाख कोटींची प्रक्लप गुजरातला; उद्योगमंत्री सामंत म्हणतात माहिती घेतोय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
