🕒 1 min read
मुंबई : वेदांत ग्रुप व फोक्सकॉनचा सेमीकंडक्टर चिप निर्मितीचा प्रकल्प गुजरातला गेला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात याचे पडसाद उमटलेले पाहण्यास मिळाले. फॉक्सकॉनचा प्रकल्प महाराष्ट्रात येण्याची सर्व प्रक्रिया झाली होती, असं ठाकरे सरकारमध्ये उद्योगमंत्री असलेल्या सुभाष देसाईंनी म्हटलं आहे. यावरून महाराष्ट्राचं राजकारण तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
काय म्हणाले राज ठाकरे ?
फॉक्सकॉन- वेदांताचा सेमीकंडक्टर बनवण्याचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला. ह्या प्रकल्पाची एकूण गुंतवणूक 1 लाख 58 हजार कोटींची आहे. हा प्रकल्प पुण्याजवळ तळेगाव येथे होणार होता. प्रचंड रोजगारनिर्मितीची क्षमता असणारा प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा?, असा सवाल याठिकाणी राज ठाकरे यांनी विचारला आहे. यासंदर्भात त्यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरून ट्विट केलं आहे.
फॉक्सकॉन- वेदांताचा सेमीकंडक्टर बनवण्याचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला. ह्या प्रकल्पाची एकूण गुंतवणूक १ लाख ५८ हजार कोटींची आहे. हा प्रकल्प पुण्याजवळ तळेगाव येथे होणार होता. प्रचंड रोजगारनिर्मितीची क्षमता असणारा प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा?
— Raj Thackeray (@RajThackeray) September 13, 2022
राज ठाकरे यांनी पुढे असंही त्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, हा सर्व प्रकार गंभीर आहे. म्हणूनच ह्या विषयाची सखोल चौकशी व्हायलाच हवी. महाराष्ट्र हे गुंतवणूकदारांच्या प्राधान्यक्रमाचं राज्य होतं. अशा राज्यातून गुंतवणुकीचा उलटा प्रवास सुरु होणं हे चांगलं लक्षण नाही. राजकारणाच्या पलीकडे जाऊन ह्या विषयाकडे बघायला हवं.
दरम्यान, यासगळ्याविषयी विद्यमान उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही याविषयी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, फॉक्सकॉन वेदांताचा प्रकल्प महाराष्ट्रातच येणार हे मागच्या दोन महिन्यात नक्की झालेलं नव्हतं. हा प्रकल्प महाराष्ट्रात येण्याची सुरूवात ही काही दोन महिन्यांपूर्वी झालेली नाही ती एक वर्षापूर्वी झाली आहे. त्यामुळे जर बैठका वेळेवर झाल्या असत्या तर प्रकल्प महाराष्ट्रात आला असता.
महत्वाच्या बातम्या :
- Eknath Shinde । पुणे-नाशिक रेल्वे मार्गासह अन्य प्रकल्पांना गती द्या; मुख्यमंत्र्यांचे ‘महारेल’ला निर्देश
- Shambhuraj Desai | सातारा जिल्ह्यातील लम्पी प्रादुर्भावाचा मंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला आढावा
- Chandrakant Patil | राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांची संख्या पाच लाख होणार – चंद्रकांत पाटील
- Uday Samant। 1. 54 लाख कोटींची प्रक्लप गुजरातला; उद्योगमंत्री सामंत म्हणतात माहिती घेतोय
- Jayant Patil । गुजरातने महाराष्ट्राच्या तोंडचा घास हिरावून घेतला; जयंत पाटलांचा हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
