Bacchu Kadu | मुंबई : दिव्यांगासाठी स्वतंत्र मंत्रालयाची घोषणा आज मुंबईत कॅबिनेटमध्ये झाली. यानंतर अमरावतीत आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं आहे.
याबाबत बोलताना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अनाथांचेच नाही तर दिव्यांगांचे सुद्धा नाथ आहे. आमचा 20 वर्षांचा लढा त्यांनी वीस दिवसात पूर्ण केला. दिव्यांग मंत्रालयासाठी उद्धव ठाकरे व अजित पवारांकडे अनेकदा पाठपुरावा केला. मात्र, त्यांनी काम केलं नाही. तर एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी वीस दिवसात केलं. त्यामुळे दोघांचे लाख लाख आभार, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. मागच्याच महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री असलेले आमदार बच्चू कडू यांनी शिंदे सरकारला पाठिंबा दिला. यानंतर त्यांनी आता शिंदे फडणवीस सरकारचे आभार मानले आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Chhagan Bhujbal | राष्ट्रवादीत फुट?, “काल आलेल्या पोरांनी…”, छगन भुजबळांचे रोहित पवारांवर संतापले
- Sushma Andhare | “अरेच्च्या विसरलेच, सध्या तुमच्या मताला…”; सुषमा अंधारेंचा चित्रा वाघ यांच्यावर पलटवार
- Uddhav Thackeray | “हिमंत असेल तर उद्धव ठाकरेंनी…”, शिंदे गटातील खासदाराचं जाहीर आव्हान
- Chitra Wagh | “आमची नावं घेऊन त्यांचं दुकान चालत असेल तर…”; चित्रा वाघ यांचा सुषमा अंधारेंना टोला
- Cabinet Decisions | मंत्रीमंडळात झालेले निर्णय काय?, जाणून घ्या एका क्लिकवर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

