🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : ‘देवेंद्र फडणवीस यांनी स्वपक्षातील लोकप्रतिनिधींएवढा मान-सन्मान आणि विकासकामांचा निधी इतर पक्षांच्या मतदारसंघात दिला होता. फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार पुन्हा येईल, असा विश्वास मंत्री बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केला.
ते म्हणाले, सध्याच्या सरकारवर टीकेची झोड उठविताना लालसेपोटी सत्तेवर आलेल्या या मंडळींचे विकासकामांना स्थगिती देण्याचे निर्णय जनतेस मान्य नाही, असे लोणीकर यावेळी म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदावर असताना नेहमीच विकासाचे राजकारण केले. सलग दोनवेळेस विधानसभेत पक्षाच्या शंभरपेक्षा अधिक जागा निवडून आणण्याची किमया देवेंद्र फडणवीस यांच्या कुशल नेतृत्वामुळे झाली आहे, असे ते म्हणाले.
दरम्यान, ठाकरे सरकारने घेतलेल्या निर्णयांवर देखील लोणीकर यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, ‘सध्याचे सरकार स्थगिती सरकार आहे. आधीच्या सरकारने घेतलेल्या अनेक चांगल्या आणि जनहिताच्या योजनांना नवीन सरकारने स्थगिती देणे ही बाबही दुर्दैवी होय.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1206423331894775808?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1206422743878553600?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
