🕒 1 min read
सिडनी : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया तिसऱ्या कसोटीतील तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. या सामन्यातील तिसऱ्या दिवसावर कांगारुंनी वर्चस्व मिळवलं आहे. कांगारुंनी तिसऱ्या दिवसखेर 197 धावांची महत्वपूर्ण आघाडी घेतली आहे.
ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या दिवशी आक्रमक गोलंदाजीने टीम इंडियाचा पहिला डाव 244 धावांवर गुंडाळला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 94 धावांची महत्वपूर्ण आघाडी मिळाली.
वॉर्नर बाद झाल्याने ऑस्ट्रेलियाची 35-2 अशी स्थिती झाली होती. मात्र यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लाबुशेनने डाव सावरला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी तिसऱ्या दिवसखेर 68 धावांची नाबाद भागीदारी केली. खेळ संपला तेव्हा लाबुशेन 47 तर स्मिथ 29 धावांवर नाबाद होते. ऑस्ट्रेलियाकडे तिसऱ्या दिवसखेर 197 धावांची आघाडी घेतली आहे.
महत्वाच्या बातम्या
- #भंडारा दुर्घटना : कोणत्याच पालकांना हे दु:ख पाहायला लागू नये : रितेश देशमुख
- मनपाच्या विद्यार्थिनींची अंतरिक्षातील भरारी सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायक
- भंडाऱ्यातील दुर्दैवी घटनेने राहुल गांधी हळहळले
- #भंडारा दुर्घटना : भविष्यात अशा घटना घडणार नाहीत याची दक्षता घेतली जाईल : टोपे
- भंडारा शासकीय रुग्णालयाच्या नवजात बालक अतिदक्षता कक्षात आग; 10 बालकांचा मृत्यू


