Share

‘हे राज्य सरकारच्या अकलेचे दिवाळे निघाल्याचे आणखी एक उदाहरण…’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अभिनेत्री कंगना रानौतच्या कार्यालयावर कारवाई करत तिचे कार्यालय तोडण्यात आले होते. यावरून कंगनाने न्यायालयात धाव घेतली होती. आता, मुंबई  उच्च न्यायालयानं बीएमसीची ही कारवाई अवैध ठरवली आहे. ‘महापालिकेने बजावलेली नोटीस आणि त्यानंतर तोडकामाचा काढलेला आदेश दोन्ही रद्दबातल करतानाच, ते कार्यालय महापालिकेला पूर्ववत करून द्यावे लागेल,’ असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. आता न्यायालयाने राज्य सरकारला देखील समज दिली आहे.

कंगना रानौतने ट्विटरद्वारे आक्षेपार्ह लिखाण करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख देखील केला होता. तर, मुंबईला पाकव्याप्त काश्मीर असं देखील तिने संबोधलं होतं. हे प्रकरण उच्च न्यायालयापर्यंत देखील गेलं. ‘तुम्ही ट्विटरवरील सर्वांच्या विरोधात जाणार आहात काय? कितीजणांविरोधात खटला दाखल करणार?’ असा सवाल उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केला आहे.

यावरूनच आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारला पुन्हा एकदा लक्ष्य केलं आहे. ‘राज्य सरकार सोशल मीडियावरील किती टीकाकारांविरुद्ध खटले दाखल करणार ? दुर्लक्ष करायला शिका… अशी समज अखेर मुंबई उच्च न्यायालयाला सूडबुद्धी ठाकरे सरकारला द्यावी लागली. हे राज्य सरकारच्या अकलेचे दिवाळे निघाल्याचे आणखी एक उदाहरण… ‘ असा टोला त्यांनी लगावला आहे.

 

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!