Share

‘मराठा आंदोलकांच्या गाड्या मुंबईच्या सीमेवर आडवणारे मोदींना दिल्ली व चीन सीमेविषयी ज्ञानामृत पाजताहेत’

Published On: 

मुंबई : केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आता दिल्लीत घुसणं अवघड होणार आहे. कारण सरकारने आंदोलनांच्या ठिकाणी दिल्लीकडे जाणाऱ्या सीमांवर कडेकोट बंदोबस्त केला आहे. तसंच बॅरिकेड्सच्या भींतींसह लोखंडी टोकदार सळया रस्त्यांवर लावल्या आहेत.

दिल्ली पोलिसांनी टिकरी सीमेवर सीसीची भिंत बनवली आहे. ही भिंत चार फूट जाड आहे. यापासून १० पावलांवर दिल्लीकडे जाणाऱ्या  एमसीडी टोलजवळ सीमेवर एक रस्ता खोदण्यात आला आहे आणि सिमेंटमध्ये लोखंडी टोकदार खिळे बसवण्यात आले आहेत. यासह येथे लोखंडी अणुकुचीदार सळया बसवण्यात आल्या आहेत. जेणेकरुन येथून कोणतंही वाहन जाऊ शकत नाही.

दरम्यान, आंदोलक शेतकऱ्यांना रोखण्यासाठी सरकारने केलेल्या या कृतीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. भारत-चीन सीमेवर खिळे लावले असते तर चिनी सैन्य भारतात घुसलं नसतं, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

शेतकऱ्यांचं आंदोलन पंजाबच्या शेतकऱ्यांचं किंवा एखाद्या राज्याचं आंदोलन नाही. हा देशाचा विषय आहे. त्यावर सरकारने चर्चा केली पाहिजे. तोडगा काढला पाहिजे, असं सांगतानाच अंहकाराने देश चालत नाही, अशी टीका राऊत यांनी केली आहे.

संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला आमदार अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे. मराठा आंदोलकांच्या गाड्या मुंबई सीमेवर अडवून त्यावरील भगवा ध्वज खाली उतरवणारे दुतोंडे आज मोदी सरकारला दिल्ली आणि चीन सीमेविषयी ज्ञानामृत पाजताहेत…असं म्हणत राऊत यांना भातखळकर यांची चांगलेच झापले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!