🕒 1 min read
मुंबई : टाळेबंदीमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले असताना आता ठाकरे सरकारने वाढीव वीजबिलात कोणत्याही प्रकारची सवलत देण्यास नकार दिला आहे. वीज ग्राहकांना वीज बिलात सवलत मिळणार नसल्याची माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे. दोन दिवसांपूर्वी महावितरणने वीज बिल वसुलीबाबत आदेश काढले होते, त्यावर बोलताना ऊर्जामंत्र्यांनी हे स्पष्ट केलं आहे.
राज्यातील वीज ग्राहकांना वाढीव वीज बिलातून दिलासा मिळणार नाही, मीटर रिडींगप्रमाणे आलेली बिलं ग्राहकांनी भरलीच पाहिजेत असं राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. ६९ टक्के वीज बिल वसुली पूर्ण झाली आहे, आता सवलतीचा विषय बंद झाला आहे. महावितरण ६९ हजार कोटीच्या तोट्यात आहे, आम्ही आता कर्ज काढू शकत नाही. महावितरणला आता वीज बिल वसुलीचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, यावरून आता राजकारण चांगलच तापलं असून भाजपचे नेते आशिष शेलार यांनी राज्यसरकारवर सडकून टीका केली आहे. ‘सरासरी’ विचार करुन विद्यार्थ्यांची जशी फसवणूक केली तशीच बनवाबनवी ‘सरासरी राज्य सरकारने’ वीज ग्राहकांसोबत ही केली. वाचाळवीर मंत्री आधी वीज बिलात सवलत देतो म्हणाले आता शब्द फिरवला..अनैतिकतेतून जन्मलेल्या आणि राज्याला अराजकतेकडे नेणाऱ्या सरकारला जनताच झटका देईल! अस ट्विट करत आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
"सरासरी" विचार करुन विद्यार्थ्यांची जशी फसवणूक केली
तशीच बनवाबनवी "सरासरी राज्य सरकारने" वीज ग्राहकांसोबत ही केली.
वाचाळवीर मंत्री आधी वीज बिलात सवलत देतो म्हणाले आता शब्द फिरवला..
अनैतिकतेतून जन्मलेल्या आणि राज्याला अराजकतेकडे नेणाऱ्या सरकारला जनताच झटका देईल!— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) November 18, 2020
महत्वाच्या बातम्या
- ‘बिहारच्या विकासासाठी भाजप नेत्यांनी काम करावं, यामुळे महाराष्ट्रात शांतता नांदेल’
- पंढरपूर येथे दररोज दोन हजार भाविकांना मिळणार विठ्ठलाचे दर्शन, ‘या’ असतील अटी
- बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त कॉंग्रेसच्या नेतृत्त्वातर्फे एकही ट्विट नाही, नितेश राणेंचा शिवसेनेला टोला
- ‘यूपीएससी मुख्य परीक्षा व मुलाखतीची तयारी करणाऱ्या अनुसूचित जमातीमधील विद्यार्थ्यांना मिळणार आर्थिक सहाय्य’
- कॉंग्रेसमध्ये इनकमिंग सुरूच, धनगर समाजाचे नेते लहू शेवाळेंचा शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
