Share

‘ठाकरे सरकार जनतेबद्दल किती संवेदनाहीन आहे हे….’, भातखळकरांचा हल्लाबोल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांनी दिवाळीपूर्वीपासून एसटीचे विलीनीकरण या प्रमुख मागणीसाठी संप पुकारला आहे. (Maharashtra ST bus strike) तो अद्यापही सुरुच आहे. काही दिवसांपूर्वी कर्मचाऱ्यांना वेतनात ४१ टक्के वाढ दिली, विलीनीकरणासाठी समितीही नेमण्यात आली. तरीही एसटी कर्मचाऱ्यांनी लाखो प्रवाशांना वेठीस धरून संप सुरूच ठेवला आहे. राज्य सरकारने संप मिटल्याची घोषणा केली असली तरी अद्याप काही कर्मचारी कामावर परतलेले नाहीत. त्यामुळे आता एसटी महामंडळाने कामावर न येणाऱ्या ५५ हजार कर्मचाऱ्यांना नोटीस पाठवली आहे. असे असतांनाच आता एसटी कर्मचाऱ्यांनी सरकारला एक पत्र लिहून आपल्या वेदना मांडल्या आहेत. तसेच सरकारकडे स्वेइच्छा मरणासाठी परवानगी मागितली आहे.

याच पार्श्वभूमीवर भाजप नेते अतुल भातखळकर(Atul Bhatkhalkar) यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. या संदर्भात भातखळकरांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’संपाच्या काळात ६७ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. आमच्याही मनात सतत आत्महत्येचा विचार येत आहेत असे हृदयद्रावक पत्र एसटी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहीले आहे. एखादे सरकार आपल्या जनतेबद्दल किती निगरगट्ट, संवेदनाहीन, मुर्दाड आणि क्रूर असू शकते त्याचे हे उदाहरण आहे’, असे भातखळकर म्हणाले आहेत.

दरम्यान, पाथर्डी येथील एसटी डेपोतील कर्मचाऱ्यांनी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवलं असून त्यामध्ये ‘संपाच्या काळात ६७ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. आमच्याही मनात सतत आत्महत्येचा विचार येत आहे. मात्र, आत्महत्या करणे हा गुन्हा आहे. त्यामुळे सरकारनेच आम्हाला स्वेच्छा मरणाची परवानगी द्यावी,’ अशी मागणी केली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!