🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : भारत सरकारने कलम ३७० हटवल्यानंतर सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे. जागतिक स्तरावर देखील भारताच्या या निर्णयाचं स्वागत केले आहे. तसेच देशातील विरोधी पक्षातील नेते या निर्णयाच्या विरोधात आहेत. तसेच सरकारवर टीका करून या निर्णयाचे राजकारण करताना दिसत आहेत.
कलम ३७० हटवण्यावरून मुस्लीम धर्मगुरु इमाम मोहम्मद तौवहिदी यांनी ‘मोदींना विरोध करण्यासाठी राहुल गांधी शत्रूंची सोबत करतात. स्वत:च्या स्वार्थासाठी ते आणि सोनिया गांधी कॅमेरासमोर येऊन रडतात’ असा आरोप राहुल गांधी यांच्यावर केला आहे. तसेच त्यांनी भारताचे कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. कायमच काश्मीर हा भारताचा भाग असल्याची भूमिका घेणाऱ्या तौवहिदी यांनी कलम ३७० संदर्भातील निर्णयाला विरोध करणाऱ्यांवर सडकून टीका केली आहे.
पुढे बोलताना त्यांनी “राहुल गांधी हे अत्यंत वाईट राजकारणी आहेत. मोदींना विरोध करण्यासाठी ते शत्रूंची सोबत करतात. सोनिया गांधीही तशाच आहेत. गाझामधील कट्टरतावाद्यांशी असलेले त्यांचे संबंध विसरता येणार नाहीत. ते स्वत:च्या स्वार्थासाठी काम करतात आणि नंतर कॅमेरासमोर येऊन रडतात. हे मुरब्बी राजकारणी नाहीत अशा शब्दात गांधी कुटुंबावर निशाणा साधला आहे.
https://twitter.com/Imamofpeace/status/1160570756029276160?s=20
दरम्यान, कॉंग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांनी यांनी काश्मीरमध्ये हिंदू बहुसंख्य असते तर कलम ३७० हटवलं असतं का ? असा प्रश्न उपस्थित केला आहे. पुढे बोलताना त्यांनी जम्मू काश्मीर मध्ये बहुसंख्य हिंदू असते तर कलम ३७० भाजपाने कधीही हटवलं नसतं असं त्यांनी म्हटलं आहे. जम्मू काश्मीर हे अस्थिर आणि अशांत आहे. मात्र भारतीय मीडिया त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो आहे असंही त्यांनी म्हटले आहे.
कलम ३७० रद्द करणे हे राष्ट्रहिताचे, त्याचे राजकारण नको : उपराष्ट्रपती
‘काश्मीरमध्ये गुंतुवणूकीसाठी उद्योजक माझ्या मागे लागलेत’
कार्यकर्त्यांनो काश्मीरात जा अन् गोऱ्या मुलीशी लग्न करा, कलम ३७० वर भाजप आमदार बरळला
द मम्मी रिटन्स : मुलाच्या नाकर्तेपणामुळे सोनिया गांधींना कॉंग्रेसची धुरा सांभाळावी लागणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

