मुंबई : कोरोना महामारीच्या जागतिक संकटातून बाहेर येताना राज्य हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मात्र तरी देखील शाळा, मंदिर अजून बंदच आहेत. यात मंदिरे सुरु करण्यासाठी भाजपने राज्यभर आंदोलन छेडले आहे. भाजपाच्या आध्यात्मिक आघाडीच्या तुषार भोसलेंनी यासाठीच तुळजापुरात आंदोलन केलं आहे.त्या आंदोलनावर टीका करताना राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अमोल मिटकरींनी भोसलेंवर जोरदार प्रहार केला आहे. काही सोंगाडे स्वतःला साधूसंत समजतात, तुम्हाला हरिपाठ पाठ आहे का सांगा?, अशी टीकासुद्धा मिटकरींनी भोसलेंवर केली आहे.
जातीय द्वेष पसरवणं ही साधुसंतांची व्याख्या असते का?, वारकरी समाज हा साधाभोळा समाज आहे. हा वारकरी समाज विठ्ठल सांप्रदायाला प्रमाण मानतो, इथे तुकोबारायांची, ज्ञानेश्वरांची, चोखोबारायांची परंपरा आहे. या महाराष्ट्राला गाडगेबाबांपर्यंतची परंपरा आहे. वारकरी सांप्रदाय जातीय द्वेष शिकवत नाही, असंसुद्धा अमोल मिटकरी म्हणाले आहेत.
हल्ली काही सोंगाडे स्वतः ला साधु संत समजुन वारकरी धर्माला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करताहेत. वाणीतुन अहंकार, जातीद्वेष क्षणोक्षणी झळकणाऱ्या अशा सोंगाड्यांची वाचा बंद करण्यासाठी तुकोबा सांगतात ,
"अवघे कोलियाचे वर्म अंडी l
घातलिया तोंडी खिळ पडे ll"@TV9Marathi— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) November 6, 2020
स्वतःला तुम्ही संतसाधू म्हणवून घेता, तुम्हाला हरिपाठ तरी पूर्ण पाठ आहे का?, असं थेट आव्हान मिटकरींनी भोसलेंना दिलं आहे. भारतीय जनता पार्टीने काही लोक मुद्दामहून सोडलेली आहेत. ही कुठली आध्यात्मिक आघाडी आहे. तुम्हाला जेवढी काळजी आहे, त्यापेक्षा जास्त काळजी महाविकास आघाडी सरकारला जनतेची आहे. जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता सरकारनं हे नियम लावलेले आहेत.
धर्माच्या नावावर वारकरी सांप्रदायाला बदनाम करण्याचं काम हे काही लोक करत आहेत, असंही अमोल मिटकरी म्हणाले आहेत. मी स्वतः वारकरी आहे. ही मुठभर मोजकी लोक यांनी मुद्दामहून सोडलेली आहेत, जेणेकरून जनतेचं लक्ष विचलित करता येईल. महाविकासआघाडीला बदनाम करण्यासाठी अशी टोकाची भाषा वापरली जात असल्याची टीकासुद्धा अमोल मिटकरींनी भाजपावर केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- देशात कोरोना सक्रिय रुग्णांच्या संख्येतील घसरणीचा कल कायम,जाणून घ्या राज्याची स्थिती
- ठरलं तर ! ‘या’ महिन्यात होणार दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा
- शेतकरी त्रस्त, मुख्यमंत्री मातोश्रीत मस्त; नवनीत राणांची जळजळीत टीका
- मोठी बातमी : दिवाळीनंतर ‘या’ दिवशी सुरु होणार राज्यातील शाळा
- देशभरातील महाविद्यालये पुन्हा सुरु करण्यासाठी युजीसीकडून मार्गदर्शक तत्त्वे जारी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

