लातूर : काँग्रेसचे नेते राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री व लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी जिल्ह्यातील साखर कारखान्याना ‘गुजरात पॅटर्न’चा आभ्यास करण्याचा सल्ला दिला आहे. विलास सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत बोलताना पालकमंत्र्यानी हे उद्गार काढले. यावेळी बोलताना ते म्हणाले की साखर कारखान्यानी ‘गुजरात पॅटर्न’चा आभ्यास करुन शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने एफआरपी पेक्षा जास्तीचा उस मोबदला देणे शक्य आहे का? याचा अभ्यास करण्याचा सल्ला यावेळी पालकमंत्री देशमुख यांनी दिला.
सोमवारी विलास सहकारी कारखान्याच्या १८व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. साखर कारखान्यानी आता फक्त साखर उत्पादनाच्या मर्यादेत न राहता मूल्यवर्धन करणाऱ्या इथेनॉल, वीज, सीएनजी, कॉम्प्रेस बायोगॅस तसेच इतर केमीकल, वैद्यकीय औषधे व उपकरणे निर्मीतीकडे लक्ष द्यावे असे पालकमंत्री अमित देशमुख यांनी सुचवले. शेतकरी व इतर घटकांना अधिकचे आर्थिक लाभ देऊन विकास प्रक्रिया गतीमान करावी असे पालकमंत्री अमित देशमुख यावेळी म्हणाले.
आताचा शेतकरी हा काटकसरीने व सुक्ष्म सिंचनाचा वापर करुन एकरी अधिकचे उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करीत आहे. उस हे हमखास उत्पन्न देणारे पीक आहे ते घेण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. पण यासाठी पाण्याचे नियोजन अवश्यक आहे असेही ते म्हणाले. यावेळी व्यासपिठावर अध्यक्ष वैशाली देशमुख, आमदार वैजनाथ शिंदे, अॅड. व्यंकट बेद्रे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्रीपती काकडे, मांजरा कारखान्याचे उपाध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांची उपस्थिती होती
महत्वाच्या बातम्या
- ठाकरे सरकारच्या प्रतिमेची शरद पवारांना वाटत असेलेली काळजी हा फक्त दिखावा ?
- बाईक लव्हर्ससाठी खुशखबर ! ‘जावा फोर्टी टू’ नव्या फिचर्ससह भारतात लाँच, जाणून घ्या किंमत
- जगातील सर्वात मोठे स्टेडियम आता नरेंद्र मोदींच्या नावाने ओळखले जाणार
- राज्यातील कायदा व सुव्यवस्था पाहता राज्याच्या गृहमंत्र्यानी राजीनामा द्यावा : माजी आ. भालेराव
- ‘मास्कचा वापर करा, फोटो व्हायरल होताहेत’ राष्ट्रवादीच्या नेत्याचा धनंजय मुंडेंना सल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
