Share

सर्व राजकीय, धार्मिक, सामाजिक कार्यक्रम, आंदोलन, यात्रा यांना राज्यात काही दिवसांसाठी बंदी !

Published On: 

मुंबई : पुणे, अमरावती, यवतमाळ, नाशिक अशा जिल्ह्यांमध्ये कडक निर्बंध लागू केले जात असताना राज्याबाबत उद्धव ठाकरे काही महत्वाचा निर्णय घेणार का ? याकडे सामान्यांचं लक्ष्य लागलं होतं. पुन्हा लॉकडाऊन होणार का ? यावर भाष्य करताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘पुढील परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घेतला जाईल. महाराष्ट्रात दुसरी लाट आलीये का ? हे पुढच्या १० ते १५ दिवसांत समजेल. स्थानिक प्रशासनाकडे निर्णय सोपवले असून अचानक लॉकडाऊन केला जाणार नाही. पूर्वकल्पना दिली जाईल,’ असं सांगत जनतेमध्ये निर्माण झालेली भीती दूर केली आहे.

सद्या लॉकडाऊनची भीती टळली असली तरी नागरिकांनी मास्क वापरणे, हात धुणे, सुरक्षित अंतर पाळणे हे गरजेचे आहे. अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल व नामुष्कीने लॉकडाऊन करावा लागेल, असं भाष्य देखील उद्धव ठाकरेंनी केलं आहे.

सर्व राजकीय, धार्मिक, सामाजिक कार्यक्रम, आंदोलन, यात्रा यांना राज्यात काही दिवसांसाठी बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. तर, ‘पक्ष वाढवू, पण कोरोना नाही, पक्ष वाढवायचा आहे जरुर वाढवा, पण कोरोना नका वाढवू,’ असा टोला देखील उद्धव ठाकरे यांनी नेत्यांना लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!