🕒 1 min read
मुंबई : भारतीय संघाचे प्रमुख खेळाडू हे इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. यादरम्यान इंग्लंड दौऱ्यावर नसलेल्या भारतीय संघाचे खेळाडू हे श्रीलंकेच्या दौऱ्यावर गेले आहे. श्रीलंका दौऱ्यावर दुय्यम संघ पाठवुन बीसीसीआयने श्रीलंकेचा अपमान केला असे श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटु अर्जुना रणतुंगाने केली होती.
अर्जुना रंणतुंगाच्या या वक्तव्यावर भारताचा माजी क्रिकेटपटु आणि समालोचक आकाश चोप्राने सडेतोड उत्तर दिले आहे. रणतुंगाला उत्तर देताना आकाश म्हणाला,’भारतीय संघात शमी, विराट, रोहित आणि बुमराह नाही म्हणून तुम्हाला हा संघ दुय्यम वाटतो. तुमच्या संघाविरुद्ध आमचा भारताचा संभाव्य संघ जर उभा केला तरीही अनुभवाचा विचार केला तरी तुमचा संघ कमीच पडेल.’ असे आकाश चोप्रा म्हणाला.
यावेळी पुढे बोलताना आकाश चोप्राने आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेविषयी बोलताना म्हणाला की, ‘आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेची पात्रता फेरी तुम्हाला खेळावी लागणार आहे. कारण अफगाणिस्तान संघ विश्वचषकासाठी आधीच पात्र झाला आहे. इंग्लंडविरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या मालिकेत तुम्हला याचा प्रत्यय येईलच.’ आकाश चोप्राच्या या वक्तव्यावर अर्जुना रणतुंगा काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘भारतीय संघ इंग्लंडमध्ये यशस्वी होईल’, चॅपेलनी व्यक्त केला विश्वास
- अतीउत्साह नडला अंगी! ‘त्या’ वक्तव्यामुळे कार्तिकला मागावी लागली माफी
- अतीउत्साह नडला अंगी! ‘त्या’ वक्तव्यामुळे कार्तिकला मागावी लागली माफी
- डेल्टा प्लस चा जिल्ह्यात एकही रुग्ण नसताना बाजारपेठेवर वेळेचा निर्बंध का?? जिल्हा व्यापारी महासंघाचा आक्षेप
- ‘केंद्राचा कृषी कायदा शेतकऱ्यांसाठी अडचणीचा, आम्ही दुसरा आणणार’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
