Share

“दुर्दैवाने काही लोक…”; हिजाब वादावर अजित पवारांची प्रतिक्रिया

Published On: 

मुंबई: कर्नाटक राज्यातील हिजाब प्रकरणाबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. हिजाब प्रकरणाला लागलेले हिंसक वळण अतिशय दुर्दैवी आहे. कोणत्याही देशात, राज्यात, शहरात धार्मिक तेढ निर्माण होणार नाही यासाठी सर्वांनीच प्रयत्न करायचे असतात, असे  मत अजित पवार यांनी  व्यक्त केले. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना मानणारे लोक आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात जे अधिकार दिले आहेत, ते अबाधित राखण्याची खबरदारी सर्वांनीच घेतली पाहीजे, असेही ते म्हणाले.

दुर्दैवाने काही लोक अशा विषयांमधून राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र आज जग पुढे जात आहे. प्रगत देश आणखी प्रगत होत आहेत. आपल्या देशात तरुणांची एवढी मोठी फळी असताना तरुणाईचा वापर विकासासाठी कसा करता येईल याचा विचार करायला हवा, असे अजित पवार म्हणाले. अशावेळी एखादी व्हिडीओ क्लिप व्हायरल केली जाते, मग त्यावरुन कुणीतरी ट्विट करतं, त्यावर काऊंटर ट्विट पडतात आणि मग त्यातून निष्कारण विषयाला महत्त्व दिले जाते. याबाबत सर्वांनी समंजस भूमिका घेऊन संयम ठेवला पाहीजे, असे आवाहन यावेळी पवारांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!