🕒 1 min read
मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून(२२ डिसें.) सुरु होत असून २८ डिसेंबर रोजी हे अधिवेशन संपणार आहे. तसेच हे अधिवेशन दरवर्षी नागपुरला होते परंतु यंदा ते मुंबईत होणार आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांनी आजच्या अधिवेशनात सर्व सामान्यांचे हित विचारात घेऊन निर्णय घेतले जातील, अशी ग्वाही दिली आहे.
यासंदर्भात अजित पवार यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’आजपासून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनात सर्वसामान्य नागरिकांचं, गोरगरिबांचं, मजुरांचं, शेतकऱ्यांचं हित विचारात घेऊन निर्णय घेतले जातील, याची ग्वाही देतो.’
आजपासून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनात सर्वसामान्य नागरिकांचं, गोरगरिबांचं, मजुरांचं, शेतकऱ्यांचं हित विचारात घेऊन निर्णय घेतले जातील, याची ग्वाही देतो. pic.twitter.com/Q27JIwDwyy
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) December 22, 2021
दरम्यान, महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. परंतु त्यांनी काही काळातच या पदाचा राजीनामा दिला. मागील अधिवेशनाचे कामकाज उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी पाहिले होते. त्यामुळे आता पुन्हा विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- हिवाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस; विविध मुद्यांवरुन भाजपा ठाकरे सरकारला घेरणार?
- “अमित शहा मस्त असले तरी त्यांचे महाराष्ट्रातील चेले हे महामस्त आहेत”
- ‘शिवसेनेला पोकळ आव्हाने देण्यापेक्षा लडाखमध्ये घुसलेल्या चिन्यांशी लढून दाखवा’
- चिंताजनक! ओमायक्रॉनच्या प्रादुर्भावाने इस्त्रायलमध्ये पहिला मृत्यू
- “एकच गुन्हा महाविकास आघाडी सरकार पुन्हा…”, भातखळकरांचे टीकास्त्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
