Share

अजित पवारांचं मोठं वक्तव्य; एसटीच विलीनीकरण केलं तर उद्या…

Published On: 

🕒 1 min read

पुणे: सध्या राज्यात एसटी कामगार आणि त्यांच्या आंदोलनाचा विषय चर्चेचा ठरत आहे. एसटी बंद असल्याने सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. त्याच सोबत एसटी कामगारांचे देखील हाल होत आहेत. मात्र अजूनही एसटी कामगार आंदोलन मागे घेण्यास तयार नाहीयेत. गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी कर्मचाऱ्यांचे पगारवाढ करणार असल्याचे जाहीर केले आहे, मात्र आता कर्मचारी विलीनीकरण करण्यावर ठाम असल्याने आंदोलन मागे घेण्यास तयार नाहीत.

मुंबईच्या आझाद मैदानावर कामगारांनी ठिय्या आंदोलन केले होते. या आंदोलनाचे नेतृत्व भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत (Gopichand Padalkar and Sadabhau Khot) करत होते, मात्र त्यांनी देखील पगारवाढ जाहीर केल्यानंतर या आंदोलनातून माघार घेत असल्याचे त्यांनी जाहीर केले. पगारवाढ झाली तरी देखील एसटी कामगार विलीनीकरण करण्याच्या मुद्द्यावर अडून बसले आहेत.

एसटी कामगारांच्या या आंदोलनावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाष्य केलं आहे. तुमचं विलीनीकरण केलं तर उद्या कोतवाल आणि पोलीस पाटीलही पुढे येतील, असं अजित पवार म्हणाले. अजित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली होती, यात ते बोलत होते. एसटीच्या संपात पगारवाढीची मागणी होती. आतापर्यंत विलीनीकरणाची मागणी नव्हती. आता मात्र ही मागणी पुढे आली आहे. उद्या एसटी कर्मचाऱ्यांचं विलीनीकरण केलं तर उद्या पोलीस पाटील आणि कोतवालही पुढे येतील, असं पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!