पुणे: पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तराफ्यावर बसून मत्स्यव्यवसायाची पाहणी करायला निघाले होते. पण तराफ्याचे इंजिन बंद पडले.अन् ते धरणाच्या मधोमध अडकले. अजित पवारांनी जास्तीचे लोक तराफ्यात बसवू नका असे अगोदरच म्हटले होते. आणि अधिकच्या वजनाने इंजिनवर ताण आला.
पुण्याच्या मावळ तालुक्यातील कासारसाई धरण येथे मत्स्यव्यवसायाची माहिती घेण्यासाठी पालकमंत्री अजित पवार सकाळी सात वाजताच पोहोचले होते. धरणाच्या मध्यभागी पिंजरा लावण्यात आलेला होता. याठिकाणी तराफा अथवा बोटीच्या साह्याने जायचे होते. मात्र यावेळी गरजेपेक्षा अधिक लोक बसले आणि यामुळे तराफ्याचे इंजिन बंद पडले.
यानंतर इंजिन सुरू करण्यासाठी चालकाने प्रयत्न सुरू केले. यासाठी मत्स्यव्यवसायाचे मालकही झटू लागले. शेवटी शेजारच्या बोटीला जवळ बोलविण्यात आलं, दादा त्यात बसले आणि पिंजऱ्यावर पोहचले. पाहणी आणि माहिती घेऊन दादा परत निघाले तेंव्हा येथील पर्यटन म्हणजे खूप कसरत घ्यावी लागते अशी मिश्किल टिपण्णी अजित पवारांनी यावेळी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
- राष्ट्रीय कार्यकारिणीवर नियुक्ती झाल्यानंतर चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…
- कोरोनाळे बंद असलेली धार्मिक स्थळं पुन्हा झाली खुली; राज्यभरातील भाविकांमध्ये उत्साह
- देवेंद्र फडणवीस तब्बल ८ लाख भाजपा कार्यकर्त्यांशी ऑनलाईन संवाद साधणार
- अभिनेता रणबीरच्या ‘या’ चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये वाढलीय उत्सुकता
- ‘या’ जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढला; तब्बल 61 गावांत कडक टाळेबंदी लागू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
