🕒 1 min read
मुंबई: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी २० मालिकेत भारतीय सांगणे २-०ने आघाडी घेत मालिका जिंकली आहे. भारतीय संघाने विंडीजला ८ धावांनी पराभूत केले आहे. यात विराट कोहली आणि ऋषभ पंत यांनी शानदार अर्धशतकी खेळी केली. दोघांनी प्रत्येकी ५२ ५२ धावा केल्या आहेत. यानंतर अजय जडेजा यांनी ऋषभ पंतची प्रशंसा केली आहे.
माजी भारतीय क्रिकेटपटू अजय जडेजाने म्हणाले ” आजचा दिवस अप्रतिम होता. कौशल्यापेक्षा पंतने दाखवलेल्या स्वभावाचे मी कौतुक करतो. ४,५,६,७ वर फलंदाजी करणारे मुले, जेव्हा चौकाराने सुरुवात करतात तेव्हा त्यांच्याकडे वेळ घेण्यासाठी आणि चांगल्या मानसिकतेत येण्यासाठी दोन चेंडू असतात. त्या २८ चेंडूंमध्ये तो परिपूर्ण मानसिकतेत होता गेल्या सहा महिन्यांत ऋषभ पंतची ही कदाचित सर्वात परिपक्व खेळी होती. पॉवर हिटिंगची जबाबदारी केवळ ऋषभ पंतवर नाही, ज्यामुळे त्याला स्पष्ट मानसिकतेने खेळता आले.”
ऋषभ पंतने केवळ ३५ चेंडूंत ७६ धावांची भागीदारी रचली.त्याच्या सोबतीला डावखुरा फलंदाज वेंकटेश अय्यर होता. ज्याने १८ चेंडूंत ३३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. विराट कोहली बाद झाल्यानंतर अय्यरचे आगमन झाले पण क्रिझवर थांबताना दोन्ही फलंदाजांनी सातत्याने मारलेल्या फटकेबाजीमुळे भारताचा धावसंख्येचा वेग अनियंत्रित राहिला. भारतने वेस्ट इंडिज विरुद्ध २-० ने आघाडी घेत मालिका जिंकली आहे.
महत्वाच्या बातम्या
- … पण मै झुकूंगा नही ; भाजप नेते मोहित कंबोज यांचा शिवसेनेवर हल्लाबोल
- मी “या” घटना आयुष्यात कधीच विसरणार नाही- नारायण राणे
- “जुहूच्या घरात एक इंचाचंही बेकायदा बांधकाम नाही, मातोश्रीच्या इशाऱ्यावरूनच…”, नारायण राणेंचा हल्लाबोल
- चेतेश्वर पुजाराचा खराब फॉर्म अजूनही कायम ; पहिल्याच रणजी सामन्यात झाला शून्यावर बाद
- Shiv Jayanti 2022 : “जोपर्यंत आमच्या रक्तात छत्रपती, तोपर्यंत आम्हाला कोणी गुलाम करू शकत नाही” – देवेंद्र फडणवीस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
