🕒 1 min read
कुडाळ : केंद्राच्या नव्या कृषी कायद्यांच्या समर्थनासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं कालपासून विशेष मोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेद्वारे नव्या कृषी कायद्यांसंदर्भातील गैरसमजुती दूर करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. राज्यातही काल या अनुषंगानं भाजपाच्या विविध नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन कृषी कायदे शेतकरी हिताचेच असल्याचं सांगितलं.
शेतकरी समृद्ध व्हावा यासाठीच केंद्र सरकारनं कृषी कायदे आणले पण कृषी कायद्याबाबत विरोधकांकडून गैरसमज पसरवले जात आहेत, असा आरोप भाजपा नेते नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ इथं वार्ताहर परिषदेत बोलताना काल केला.
राणे म्हणाले, विरोधक हे विधेयक समजून न घेता आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांच्या भावना भडकविण्याचे काम करत आहेत. त्यांच्या या आंदोलनाला शेतकऱ्यांनी बळी पडू नये. विधेयकाचा हेतू या देशातील शेतकरी समृद्ध व्हावा, शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट व्हावे, हा आहे. शेतकरी आपला माल कुठेही मुक्तपणे विकतील, बाजार भाव ठरवतील, अधिक आर्थिक फायदा होईल, दलाल, गुंड पध्दत रद्ध होईल, अर्थव्यवस्या बळकट होईल.
गाव ते परदेशात कुठेही आपला माल विकण्याचे स्वतंत्र या विधेयकामुळे मिळाले आहे. एक देश एक बाजार हा मंत्र घेऊन मोदींनी योजना सुरू केली. विरोधक अफवा, गैरसमज पसरवण्याचे काम करत आहेत. त्यांचा अभ्यास शून्य आहे असं राणे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- अण्णा हजारे शेतकरी आंदोलनात सहभागी होतील असं वाटत नाही : गडकरी
- ‘ते’ बंगले खाजगी प्रॉपर्टी नाहीत, झालेल्या खर्चात काही गैर नाही – अशोक चव्हाण
- अहमद पटेल यांचे सत्तेत असूनही सत्तेतील पदांमध्ये त्यांचे मन कधीच रमले नाही : शरद पवार
- निवडणुकीनंतर सरपंचपदाची आरक्षण सोडत काढण्याचा निर्णय राजकीय हेतूने- दरेकर
- मोदी सरकारसाठी शेतकरी आंदोलनकर्ते खलिस्तानी तर भांडवलदार हे उत्तम मित्र- राहुल गांधी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
