Share

ऐतिहासिक विजयानंतर कर्णधार मनप्रीत सिंगने केले मन जिंकणारे वक्तव्य, म्हणाला…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : टोकीयो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने गुरुवारी इतिहास घडवला आहे. कांस्यपदकाच्या लढाईत भारताने जर्मनीचा पराभव करत पदक पटकावले आहे. या सामन्यात भारताने बलाढ्य जर्मनीचा ५-४ असा पराभव करत तब्बल ४१ वर्षानंतर ऑलिम्पिक स्पर्धेत पदक पटकावले आहे.

या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंगने हा विजय कोरोना योद्ध्यांना समर्पीत केला आहे. ४१ वर्षाच्या दिर्घ प्रतिक्षेनंतर मिळालेला हा विजय मी देशातील सुरु असलेल्या कोरोनाविरुद्धच्या लढ्यातील योध्यांना समर्पीत करत आहे. हे कांस्यपदक सर्व कोरोना योद्धे आणि पहिल्या फळीतील कर्मचारी यांच्यासाठी आहे. अशा शब्दात त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या.

उपांत्य फेरीचा सामना गमावल्यानंतर जर्मनीविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ सुरुवातीला दबावात होता. जर्मनीने या सामन्यात सुरुवातीला ३-१ अशी आघाडी घेत भारतीय संघाला बॅकफुटवर ढकलले. मात्र तिसऱ्या सत्रापुर्वी भारताने सलग दोन गोल केले. यानंतर तिसऱ्या सत्रात भारतीय संघाने जोरदार पुनरागमन करत आणखी दोन गोल करत ५-३ अशी आघाडी घेत विजयावर शिक्कामोर्तब केले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!