मुंबई : आजचा दिवस राज्याच्या राजकारणात वादळी ठरत आहे. शिवसेना विरुद्ध कंगना रणौत सामना आता तापला असून इतके दिवस शिवसेना खासदार संजय राऊत यांना भिडणाऱ्या कंगनाने शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच थेट आव्हान दिल आहे.
यानंतर माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील महाविकास आघाडीवर निशाणा साधल्याचे पाहायला मिळाले. ” छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातलं हे सर्वात घाबरट आणि लोकशाही विरोधी सरकार असून आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्य सरकारच्या या कृत्यामुळे महाराष्ट्र राज्याची बदनामी होत आहे.” असा घणाघात महाविकास आघाडी सरकारवर त्यांनी केला.
मुंबईतील इतर अनधिकृत बांधकामांवर का कारवाई होत नाही? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. आज कंगना रणौत मुंबईमध्ये दाखल झाली आहे. याच पार्श्वभूमीवर सुडबुद्धीच्या राजकारणाने कंगनाच्या कार्यालयावर कारवाई केली जात असल्याचे आरोप आता शिवसेनेसह मुंबई महापालिकेवर होत आहे. तर, खुद्द उच्च न्यायालयाने देखील या कारवाईला स्थगिती दिली आहे.
महत्वाच्या बातम्या:-
राहुरीच्या लॉकडाऊनला व्यापार्यांचा विरोध
मराठा आरक्षणाला स्थगितीमुळे व्यथित, समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्नांची शर्थ करू : देवेंद्र फडणवीस
कंगना राणावतची बाजू घेणाऱ्यांनो २६ /११ च्या हल्यातील शहीदांचे योगदान आठवा…
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? हे सविस्तर जाणून घेण्यासाठी पहा खालील व्हिडिओ –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

