🕒 1 min read
नवी दिल्ली: गेल्या २५ दिवसांपासून कडाक्याच्या थंडीत देखील दिल्लीत शेतकर्यांनी केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरुद्ध आंदोलन सुरूच ठेवल आहे. या आंदोलनावर शेतकरी नेत्यांशी सरकारकडून चर्चा करण्यात आली , तर शेतकरी आंदोलन समर्थ भारत बंद ठेवत सर्वस्तरातून पाठींबा देखील देण्यात आला होता. मात्र अद्याप देखील या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा निघालेला नाही.
कडाक्याच्या थंडीनं गारठलेल्या देखील शेतकरी आंदोलनामुळे दिल्लीत वातावरण दिवसेंदिवस तापताना दिसत आहे. तर या दरम्यान केंद्र सरकार आणि उद्योगाकांच्या हितसंबंधांसाठी हे कायदे आणले गेल्याचे बोलले जात असतानाच रविवारी संयुक्त किसान मोर्चाने तयार केलेल्या किसान एकता मंच फेसबुक पेजवरून बराच गोंधळ झाला होता. फेसबुकनं हे पेज ब्लॉक केलं. त्यानंतर फेसबुकविरोधात संताप वाढल्यानंतर हे पेज पुन्हा सुरू करण्यात आलं.
In midst of a Facebook Live I was doing from Kisan Ekta Morcha's page, we get a notification that the FB page has been unpublished.
There must be something about farmers that this govt is particularly scared of & something about this govt that Facebook is particularly scared of https://t.co/yYCZu6r3UR pic.twitter.com/xjnpS7nRRi
— Yogendra Yadav (@_YogendraYadav) December 20, 2020
दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलनाची माहिती देण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने फेसबुकवर किसान एकता मंच नावाचं पेज तयार करण्यात आलं आहे. मात्र रविवारी फेसबुक लाईव्ह करत असताना मध्येच पेज अनपब्लिश्ड झाल्याचा संदेश मिळाला. योगेंद्र यादव यांनी याविषयी माहिती दिली आहे. शेतकऱ्यांविषयी असं काही तरी आहे, ज्यामुळे हे सरकार घाबरले आहे आणि सरकार असं काहीतरी आहे ज्यामुळे फेसबुकला भीती वाटली आहे, असा आरोप योगेंद्र यादव यांनी केला.
किसान एकता मंचचं फेसबुक पेज ब्लॉक केल्यानंतर तीन तासांनी पुन्हा अनब्लॉक करण्यात आलं. फेसबुककडून ही कारवाई करण्यात आली होती. त्यावर नंतर फेसबुकनं खुलासाही केला आहे. किसान एकता मंचच्या पेजकडून कंपनीच्या कम्युनिटी नियमांचं पालन केलं जात नव्हतं म्हणून पेज बंद करण्यात आलं होतं, असं फेसबुककडून सांगण्यात आलं आहे.
फेसबुकनं किसान एकता मंचचं इन्स्टाग्राम अकाऊंटही बंद केलं असल्याचा दावा यादव यांनी केला. फेसबुकनं केलेल्या कारवाईवरून संतप्त प्रतिक्रिया उमटायला लागल्या. त्यानंतर फेसबुककडून पुन्हा किसान एकता मंचचं फेसबुक पेज आणि इन्स्टाग्राम अकाऊंट सुरू करण्यात आलं.त्यामुळे शेतकरी आंदोलानामध्ये येत चाललेल्या नवनवीन वादांची मालिका सुरूच आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘अयोध्येच्या रामाचे मंदिर वर्गणीतून बांधायचे?’, शिवसेनेचा भाजपला परखड सवाल
- कुठे हिमालय आणि कुठे मुतखडा; ‘या’ नेत्याने केली पडळकरांवर जहरी टीका
- तिढा सुटणार? मेट्रो कारशेडप्रकरणी शरद पवार करणार मध्यस्थी!
- …अन् गृहमंत्र्यांनी केले दिव्यांग लेकीचे कन्यादान !
- मुंबई मेट्रोची कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करा – उद्धव ठाकरे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
