Share

‘दहीहंडीनंतर आता मनसे साजरा करणार बैलपोळा उत्सव’

Published On: 

🕒 1 min read

नागपूर: राज्य सरकारची बंदी असतानाही मनसेने जोमात राज्यभरात दहीहंडी उत्सव साजरा केला. आता पुन्हा एकदा मनसेने ठाकरे सरकारला आव्हान दिले आहे. लवकरच बैलपोळा उत्सव येत आहे. ‘शेतकऱ्यांनी बैलपोळा उत्सव जोमाने साजरा करावा, मनसे शेतकऱ्यांसोबत आहे’, असे विधान मनसे नेते राजू उंबरकर यांनी केले आहे.

कोरोनामुळे विदर्भात सणांवर बंदी घातली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा बैलपोळा मिरवणूक काढू नये, असे आदेश प्रशासनाने दिले आहेत. मात्र दुसरीकडे मनसेने शेतकऱ्यांना बैलपोळा साजरा करण्याचे आवाहन केले आहे.

मात्र प्रशासनाने मोठा पोळा व तान्हा पोळा सार्वजनिक रित्या साजरा करण्यास प्रतिबंध घालण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी हा सण घरीच साजरा करावा बैलांच्या मिरवणूका काढण्यात येऊ नये. आरती, पुजा व अन्य धार्मिक कार्यक्रमात गर्दी होणार नाही. तसेच ध्वनीप्रदुषनाच्या नियमांचे पालन करावे. बैलांची पुजा करतांना शारीरिक अंतर पाळणे, तोंडाला मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर करणे असे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!