Share

‘या’ विषयात १०० टक्के गुण असतील तरच मिळणार महाविद्यालयात प्रवेश

Published On: 

नवी दिल्ली : दिल्ली विद्यापीठाच्या दोन महाविद्यालयांमध्ये फक्त १०० टक्के गुणवंतांनाच प्रवेश दिला जाणार आहे. होय… तुम्ही जे वाचत आहात ते खरं आहे. दिल्लीतील जिझस अ‍ॅण्ड मेरी कॉलेज व हंसराज कॉलेज यांनी काही विषयांसाठी १०० टक्के कट ऑफ गुणांची मर्यादा लागू केली.

जेएमसीत राज्यशास्त्रासाठी गेल्या वर्षी ९७.७५ टक्के कट ऑफ होता, तो आता ९९.७५ टक्के करण्यात आला आहे. अर्थशास्त्र ९८.५ टक्के, इंग्रजी ९९ टक्के, मानव्यशास्त्रे व विज्ञान ९७ टक्के याप्रमाणे कट ऑफ गुण आहेत. हंसराज महाविद्यालयाने अर्थशास्त्रासाठी ९८.७५ टक्के, भौतिकशास्त्र ९८.३३ टक्के कट ऑफ लागू केला आहे.

इतिहास, प्राणिशास्त्र, इंग्रजी, रसायनशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, भूगर्भशास्त्र, गणित या विषयांसाठी कट ऑफ वाढले असून ते ९६.६६ टक्के ते ९८ टक्के दरम्यान आहेत. देशबंधू महाविद्यालय, आर्यभट्ट महाविद्यालय यांनीही कट ऑफ वाढवले आहेत. सीबीएसई परीक्षेत बारावीला ७० हजार विद्यार्थ्यांना ९५ टक्क्यांहून अधिक गुण मिळाल्याने कट ऑफ वाढल्याचे दिल्ली विद्यापीठाने म्हटले आहे.

जिझस अ‍ॅण्ड  मेरी महाविद्यालयात बीए मानसशास्त्र या विषयासाठी १०० टक्के कट ऑफ गुण लागू करण्यात आले. गेल्या वर्षी ९९. ५ टक्के इतका कट ऑफ होता, आता तो १०० टक्के करण्यात आला आहे. हंसराज महाविद्यालयात बी.एस्सी. संगणक विज्ञानासाठी ९७.२५ टक्के कट ऑफ गेल्या वर्षी होता, तो आता वाढवण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!