मुंबई – भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करताना सोमय्या दिसून येत असून अनेक मंत्री सोमय्या यांच्यामुळे अडचणीत आले आहेत. विशेषतः माजी गृहमंत्री अनिल देशमुख,हसन मुश्रीफ,अनिल परब आदी नेते सोमय्या यांच्या रडारवर आहेत.
मध्यंतरी कोल्हापूरला जाताना सोमय्या यांना रोखण्यात आले होते यावरून देखील सोमय्या चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे सोमय्या यांच्या आरोपांची मालिका सुरुच असून यावेळी कुणी राजकीय नेता नाही तर मुंबईचे पोलीस सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी त्यांनी लक्ष्य केलं आहे. विश्वास नांगरे पाटील महाविकास आघाडी सरकारचे माफिया म्हणून काम करत असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.
घोटाळ्यांच्या प्रकरणात राज्य सरकार तपासात अडथळे निर्माण करत आहे. त्यामुळे आम्हाला केंद्राकडे जावे लागते. हसन मुश्रीफ यांच्या प्रकरणात त्यांच्यावर मुंबई पोलीसांनी केलेल्या कारवाईबाबत बोलाताना किरीट सोमय्या यांनी म्हटलं की, मुंबईचे सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी ठाकरे सरकारचा माफिया म्हणून काम करता येत नाही हे लक्षात घ्यावं. विश्वास नांगरे पाटलांनी मला तर बेकायदेशीर रित्या मला घरात कोंडून ठेवलं. तेच सूचना देत होते, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.
दरम्यान, सोमय्या यांच्या या आरोपांवरून आता मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील चांगलेच आक्रमक झाले आहेत. विश्वास नांगरे पाटलांवर आरोप करून बदनाम करत असाल तर रस्त्यावर उतरू असा इशारा आबासाहेब पाटील यांनी दिला आहे. पोलिस अधिकारी विश्वास नांगरे पाटील राज्यातील प्रामाणिक अधिकारी आहेत. अशा प्रामाणिक अधिकाऱ्यांवर चुकीचे आरोप करू नका असं देखील ते म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- स्वच्छ भारत मिशनच्या दुसऱ्या टप्प्यात होणार पंधराशे कोटींची कामे – छगन भुजबळ
- धर्मांतरण प्रकरणात उत्तर प्रदेश ATS ने केली यवतमाळच्या धीरज जगतापला अटक
- ‘इंदिरा गांधींसारखे नेतृत्व असते तर..’, पंजाबमधील राजकीय घडामोडींवर शिवसेनेची भूमिका
- ताडोबा व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी झाला खुला, पर्यटकांनी भरभरून दिला प्रतिसाद
- ‘सरकार आले तेव्हा झोकून काम करायला सुरूवात केली मात्र कोविड आला आणि राज्याच्या तिजोरीत खडखडाट झाला’


