🕒 1 min read
मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी होताना दिसून येत आहेत. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांमुळे राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या बाजूने आपली ताकद दाखवत आहेत. दरम्यान काल (शनिवार) मुंबईतील लाला कॉलेजच्या सभागृहात महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी शनिवारी भाषणातून आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला. यावेळी आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदे गटाला इशारा देखील दिला आहे. विधानसभेचा रस्ता वरळी आणि भायखळ्यातून जातो, लक्षात ठेवा, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
आदित्य ठाकरे म्हणाले, “बरं झाली घाण गेली. ज्यांना मदत केली, ज्यांना उमेदवारी दिली त्यांनी पक्षाशी गद्दारी केल्याचे वाईट वाटते. बंडखोर आमदारांमध्ये जर हिंमत असती तर बंड करण्यासाठी सूरतला जाण्याची काय गरज होती?” असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. शनिवारी झालेल्या युवा सेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते.
दरम्यान राजकीय संकटात शिवसेना पूर्ण ताकदीने बंडखोर आमदारांचा सामना करत आहे. शनिवारी राष्ट्रीय कार्यकारिणीने बंडखोर आमदारांवर कारवाई करण्याचे अधिकार उद्धव ठाकरे यांना दिले असून शिवसेना किंवा बाळासाहेब ठाकरे यांचे नाव वापरणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही ठरले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Sanjay Raut : “…मग महाराष्ट्रात मशान आहे काय?”, संजय राऊतांचा बंडखोर आमदारांना टोला
- IND vs ENG : विराट कोहली पुन्हा होणार भारताचा कर्णधार?
- Kangana Ranaut : इंदिरा गांधींच्या भूमिकेसाठी कंगना राणौत तयार, म्हणाली…
- IND vs ENG : भारताला ‘मोठा’ धक्का; कॅप्टन रोहित शर्मा कोरोना पॉझिटिव्ह!
- Sanjay Raut : “सर्व घडामोडींचे सूत्रधार फडणवीस असतील तर…”, संजय राऊतांचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
