🕒 1 min read
मुंबई: राज्यातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी सेनेशीच बंड करत वेगळा गट स्थापन केला आहे. त्याचा परिणाम महाविकास आघाडी सरकारवरही होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवरून शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आजच्या सामना ‘रोखठोक’ मधून माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधला आहे.
महाराष्ट्रात आजही ठाकरे कुटुंबाविषयी कमालीची आस्था व कृतज्ञता आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी श्रद्धा आहे. बाळासाहेबांचा आत्मा ज्यांनी दुखावला त्यांचे राजकीय श्राद्धच महाराष्ट्रात घातले गेले. 22 जूनला संध्याकाळी उद्धव ठाकरे यांनी जनतेला उद्देशून एक भावनाविवश भाषण केले. त्यामुळे महाराष्ट्राच्या घराघरांत अश्रुधारा वाहिल्या. सांजवेळी ठाकरे व त्यांच्या कुटुंबाने ‘वर्षा’ बंगल्यातून सामान आवरून ‘मातोश्री’कडे प्रस्थान केले तेव्हा रस्त्यात ठाकरेंच्या मानवंदनेसाठी दुतर्फा गर्दी होती. सांजवेळी बाळासाहेबांच्या मुलास घर सोडावे लागले याचा प्रचंड संताप लोकांत, खासकरून महिलावर्गात होता. त्या एका घटनेने महाराष्ट्र हेलावला. अश्रूंत मोठी ताकद असते येणारा काळच सिद्ध करेल.
मात्र या सर्व घडामोडींचे सूत्रधार देवेंद्र फडणवीस असतील तर त्यांनी पुन्हा एकदा चुकीचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेतील फुटिरांना प्रोत्साहन देऊन फडणवीस सरकार बनवणार असतील तर सरकार टिकणार नाही. या सर्व आमदारांची भूक मोठी आहे. त्यांनी आईला सोडले तेथे फडणवीसांना काय साथ देणार? फुटिरांबरोबर सरकार बनवणे म्हणजे अस्वलाच्या गुदगुल्या ठरतील. महाराष्ट्र हे स्वीकारणार नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Shah Rukh Khan : सलमान खानबद्दल शाहरुख खानचे मोठे वक्तव्य, म्हणाला…
- Sanjay Raut : ‘ते’ आमदार मुळचे शिवसेनेचे नाहीत; संजय राऊतांनी घेतला समाचार
- Aditya Thackeray : “बरं झाली घाण गेली…” ; आदित्य ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात
- Sanjay Raut : “…तर शिंदेच मुख्यमंत्री झाले असते”, संजय राऊतांनी सांगितला ‘तो’ प्रसंग
- Sanjay Raut : शिंदेंचे मुख्यमंत्री पद कोणी रोखले?; संजय राऊतांचा ‘रोखठोक’ सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
