Share

‘काँग्रेसने १०० कोटींच्या तफावतीचा आरोप केल्याने आदित्य ठाकरेंना कोरोनाची लागण ?’

Published On: 

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकांना अद्यापही बराच अवधी आहे. मात्र, राजकीय पक्षांमध्ये आता पासूनच आरोप-प्रत्यारोपांच्या फेरी सुरु आहेत. २०२२ मध्ये होणाऱ्या निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. दरम्यान, आता राज्यातील महाविकास आघाडीमध्ये असलेल्या सहकारी काँग्रेस पक्षानेच शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेत ८०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे.

यासोबतच, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ असलेल्या वरळी विधानसभा मतदारसंघात मालमत्ता कर वसुलीत 100 कोटींची तफावत असून या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी देखील काँग्रेस नेते आणि मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली आहे.

काँग्रेसनेच शिवसेनेवर हे आरोप केल्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. तर, भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी आदित्य ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. ‘आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात मालमत्ता कर वसुलीत १०० कोटींची तफावत असल्याचा काँग्रेसने ‘घरचा आहेर’ दिला असल्यामुळे तर पर्यावरण मंत्र्यांना कोविडची लागण झाली नाही ना?’ असा टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!