मुंबई- छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून पुन्हा एकदा देशात मोठा वाद निर्माण झाला आहे. राज्यसभेत नवनियुक्त सदस्य शपथ घेत असतानाच छत्रपतींच्याच वंशजांनी ‘ जय भवानी, जय शिवाजी’ म्हटल्यामुळे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आक्षेप घेतला होता. त्यामुळे पुन्हा एकदा दिल्ली ते गल्ली राजकीय आरोप प्रत्यारोपांचा धुरळा उडाला.
व्यंकय्या नायडु यांनी काल छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केल्याचा आरोप करत शिवसेना चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.खासदार संजय राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप केले. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झालाच नाही असं भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे.
उदयनराजे भोसले यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया देताना व्यंकय्या नायडू यांचं वर्तन चुकीचं नसून आक्षेप घेणाऱ्यांना त्यांनी समज दिली असल्याचं म्हटलं. महाराजांचा अपमान झालाच नाही तर राजीनामा देण्याचा आणि आंदोलनाचा प्रश्नच नसल्याचंही ते म्हणाले. यावेळी त्यांनी शिवाजी महाराजांच्या नावे राजकारण केलं जाऊ नये असं आवाहन केलं.
जय भवानी, जय शिवाजी,
जय जिजाऊ, जय शिवराय !! pic.twitter.com/aB9ZTP0mNS— Riteish Deshmukh (@Riteishd) July 24, 2020
एका बाजूला हे सर्व सुरु असताना आता अभिनेता रितेश देशमुख यानेही या प्रकरणावार बोलकी प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेता रितेश देशमुख याने छत्रपती शिवाजी महाराज यांचा एक फोटो ट्वीट करत ‘जय भवानी, जय शिवाजी…जय जिजाऊ, जय शिवराय,’ असं कॅप्शन लिहिलं आहे. दिल्लीतील प्रकरणानंतर वादंग निर्माण झालं असतानाच रितेश देशमुखने दिलेली ही प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरली आहे.
महत्वाच्या बातम्या-
‘मदरशांसाठी कोट्यावधींचा निधी तर कोविड योध्याचे वेतन अजूनही थकलेले’
विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून वैद्यकीय परीक्षा नको – अमित देशमुख
“नगरसेवक हरवले आहेत, आजारात सोडलत आता आम्ही मतदान करताना सोडतो!”
टिकटॉकवर बंदी; ‘या’ प्रसिद्ध कलाकारांनी केले सरकारच्या निर्णयाचे तोंडभरून कौतुक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

