Share

कोरोनामुळे ‘सीआयडी’च्या अभिजीतला पण करावा लागला आर्थीक संकटाचा सामना

Published On: 

मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. कोरोनाच्या या लाटीत अनेक मान्यवरांना कोरोनाची लागण झाली तर अनेकांचे रोजगार बुडाल्याने आर्थीक संकटही ओढावले. सोनी टिव्ही वरील प्रसिद्ध मालिका सीआयडी मालिकेत इन्स्पेक्टर अभिजीतची भूमिका साकारणारा अभिनेता आदित्य श्रीवास्तवही कोरोना काळात आर्थिक संकटात सापडला होता.

सीआयडी मालिकेतील इन्स्पेक्टर अभिजीतच्या भूमिकेने घराघरात पोहचलेल्या आदित्यने कोरोना काळात आर्थीक संकटाचा सामना केला आहे. याचा खुलासा नुकत्याच त्याने दिलेल्या एका मुलाखतीत केला आहे. यावेळी तो म्हणाला की, ‘कोरोनाच्या काळात लागु केलेल्या लॉकडाउनमुळे अनेक कलाकार आणि तंत्रज्ञाच्या हाताला रोजगार नव्हता. अनेक कलाकारांना काम नसल्यामुळे आर्थीक अडचणीचा सामना करावा लागला. हीच वेळ माझ्यावरही आली होती.’ असे या मुलाखतीत आदित्य म्हणाला.

यावेळी आदित्य पुढे म्हणाला की,’सध्याच्या काळात आपण सर्वानी एकत्र येत एकमेकांना मदत करण्याची गरज आहे. या कठीण काळात कोणतीही तक्रार न करता पुढे जाणे गरजेचे आहे’ असे प्रतिपादन आदित्यने केले. आदित्याचा नुकताच ‘वनरक्षक’ नावाचा एक चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात आदित्य एका वन अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात आदित्यासोबत यशपाल शर्मा, फलक खान तसचं धिरेंद्र ठाकूर हे कलाकार आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!