टीम महाराष्ट्र देशा : वऱ्हाड निघालं लंडनला हे खूप गाजलेलं नाटक होतं, पण आमच्या बाबतीत वऱ्हाड निघालं भाजपकडे असं म्हणावं लागेल, असं म्हणत काँग्रेसमधून निलंबीत झालेले आमदार अब्दुल सत्तार यांनी भाजप प्रवेशाचे स्पष्ट संकेत दिले आहेत. मी एकटाच नाही तर माझ्यासह काँग्रेसचे ७ आमदार भाजपमध्ये प्रवेश करतील, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला आहे.
दरम्यान, सिल्लोड-सोयगावचे आमदार अब्दुल सत्तार यांनी औरंगाबादेतील उमेदवारीवरुन पक्षाविरोधात बंड पुकारला होता. राधाकृष्ण विखे हे भाजप प्रवेश करणार असून त्यांच्यासोबत काँग्रेसचे काही आमदार देखील प्रवेश करणार असून त्यांचा मंत्रिपद फिक्स मानलं जातं आहे .


