मुंबई : बॉलिवूडमधील १९ व्या काळातील अनेक चित्रपट सुपरहिट ठरले होते. असाच एक १९९५ मधील ‘रंगीला’ चित्रपट लोकप्रिय ठरला. दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होत. राम गोपाल वर्मा यांनी प्रेक्षकांसाठी अनेक सुपरहिट चित्रपट सादर केले आहेत. सध्या सोशल मीडियावर राम गोपाल वर्मा बेधडक वक्तव्यासाठी ओळखले जातात. रंगीला सुपरहिट झाल्यानंतर देखील आमीर खानने राम गोपाल वर्मा यांच्यासोबत पुढे कधीच काम केला नाही. अलीकडेच त्यांनी आमीर खानविषयी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.
हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर ‘रंगीला’ चे दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी असे काही वक्तव्य केले होते की, ते ऐकल्यानंतर आमीर खानने त्याच्याशी थेट संबंध तोडले. राम गोपाल यांनी या सिनेमात वेटरने आमिरपेक्षा चांगली भूमीका केली असल्याचे म्हंटले होते. या वक्तव्यानंतर दोघांमध्ये एक गैरसमज निर्माण झाला. काही वर्षांनंतर राम गोपाल वर्मा यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यावेळी मोबाईल फोन नव्हते. त्यामुळे मी आमीरशी त्वरित संपर्क साधू शकलो नाही. मात्र नंतर दोघांनी एकमेकांची भेट घेतली आणि त्यांचे गैरसमज दूर केले.
राम गोपाल वर्मा म्हणाले, ‘आमीर एक अतिशय समर्पित, भावूक आणि धैर्यवान माणूस आहे. मी तसा नाही.’ ते म्हणाले की, त्यांच्यात आणि आमीरमध्ये ‘वादावादी’ नव्हती, तर ते ‘गैरसमज’ होते. आमीर खान आणि उर्मिला मातोंडकर यांच्या सुपरहिट ‘रंगीला’ चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. ‘रंगीला’मध्ये आमीर खान आणि उर्मिला मातोंडकर यांच्यासह अभिनेते जॅकी श्रॉफदेखील मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमालीची यश मिळवले होते. या सिनेमातील गाण देखील सुपरहिट झाले, आजही हा चित्रपट लोक आवडीने पाहतात.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘देश फक्त 6 महिन्यांसाठी पुन्हा एकदा डॉ. मनमोहन सिंगांच्या हाती द्या’
- ६०० मीटर अंतरावरील कृषी पंप जोडणीलाही आता मिळणार प्राधान्य
- WHOने केला कोरोना विषाणूच्या B.1.617 या प्रकाराचा चिंताजनक प्रकारामध्ये समावेश
- ‘लसीकरण बंद करण्याबाबतचे आरोग्यमंत्र्यांचे ‘ते’ विधान म्हणजे खोटारडेपणाचा कळस’
- ‘पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी जे नियोजन करायला हवे होते ते केले नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

