मुंबई : अन्वय नाईक प्रकरण सध्या देशभरात गाजत आहे. या प्रकरणी रायगड पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामीला अटक केली आहे. काल अर्णबच्या जामीनावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. मात्र, न्यायालयाने दिलासा न देता न्यायालयीन कोठडी सुनावलेल्या अलिबाग सत्र न्यायालयात जामीनासाठी पुन्हा याचिका दाखल करण्यास सांगितले.
अर्णब गोस्वामींच्या अडचणीत आणखी वाढ होताना दिसत आहे. मुंबई पोलिसांनी बनावट टीआरपी रॅकेट उघडकीस आणल्यानंतर यात रिपब्लिक भारत, फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा या वाहिन्यांचे नाव समोर आलं होतं.या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे सहउपाध्यक्ष घनश्यामसिंह यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.
मुंबई पोलिसांच्या गुन्हे गुप्तवार्ता विभागाने घनश्यामसिंह यांनी त्यांच्या घरातून आज सकाळी अटक केली. बनावट टीआरपी प्रकरणी आतापर्यंत एकूण 12 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. याआधी काही वेळा घनश्यामसिंह यांची चौकशी करण्यात आली होती. सिंह यांच्यामुळे आधीच अडचणीत आलेल्या गोस्वामींच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणातही गोस्वामी यांच्यावर कारवाई होऊ शकते.
महत्वाच्या बातम्या
- बिहारची निवडणुक लढविणाऱ्या सेनेच्या वाघांचे डिपॉझिट जप्त होण्याची शक्यता
- राज्यातील तब्बल ‘या’ १७ शहरांत फटाके उडवल्यास आणि विकल्यास होऊ शकतो जबर दंड!
- बिहारच्या विजयाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस; पूर्ण निकाल येण्याआधीच भाजप नेत्याने दिलं श्रेय
- ‘आरोपीला सहानुभूती दाखवण्याऐवजी राज्यपालांनी नाईककुटुंबाला सहानुभूती दाखवायला हवी होती’
- सांगलीत चोरांनी चोरीसाठी वापरलेली आयडिया पाहून तुम्हीही लावाल डोक्याला हात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
