Share

तळणी गावात अवतरला बिबट्या, गावकऱ्यामध्ये भितीचे वातावरण

Published On: 

औरंगाबाद : भराडी ग्रामपंचायती अंतर्गत तळणी या गावाजवळ अर्धा किमी अंतरावर सोमवारी काही शेतकऱ्यांना बिबट्या दिसल्याने परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावापासून अर्धा किमी अंतरावर २० एकर हुन अधिक पडीक जमीनीवर विविध झाडे, उंच झुडुपे आहे. या निर्जन ठिकाणी छोटा तलाव आहे व पाणी पिण्याच्या उद्देशाने बिबट्या येथे आला असावा अशी शंका गावकऱ्यांनी व्यक्त केली.

सोमवारी दुपारी शेतात काम करणाऱ्या काही शेतकऱ्यांना बिबट्या दिसला. बिबट्यास बघीतल्याने शेतातील बैल सुद्धा भीतीने बिथरले. या परिसरात बिबटया दिसण्याची ही पहिलीच घटना आहे. येथून १० किलोमीटर अंतरावर अजिंठा डोंगर आहे. सदर घटनेची माहिती जिल्हा परिषद सदस्य अशोक गरुड यांनी वनविभागास कळवली आहे.

गावकऱ्यांनी भिती बाळगू नये

उन्हाळ्याची सुरु झाल्याने जंगलात पाण्याची वानवा जाणवू लागली आहे. त्यामुळे अन्न व पाण्याचा शोधात बिबटे, हरीण, लांडगे व इतर वन्यजीवांनी आपला मोर्चा मानवी वस्ती तथा गावाकडे वळवला आहे. कोणताही वन्यप्राणी अधिक काळ गावाजवळ राहणे शक्य नाही त्यामुळे गावकऱ्यांनी बिबट्याची भीती बाळगू नये, येथील डॉ. संतोष पाटील यांनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!