Share

इंडिया गेटवर बसवला जाणार नेताजींचा भव्य पुतळा; रावसाहेब दानवेंनी म्हटले हीच खरी श्रद्धांजली

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा बसवण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, जेव्हा संपूर्ण देश नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२५वी जयंती साजरी करत आहे, तेव्हा मला कळवताना आनंद होत आहे की, इंडिया गेटवर त्यांचा ग्रेनाइटचा भव्य पुतळा बसवला जाणार आहे. हे त्यांच्याप्रती भारताचे ऋणानुबंधाचे प्रतीक असेल. मोदींच्या या निर्णयाचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Union Minister Raosaheb Danve) यांनीही स्वागत केले आहे.

मोदींनी घेतलेला हा निर्णय देशाच्या प्रती नेताजींची निष्ठा, भक्ति आणि समर्पण याला दिलेली खरी श्रद्धांजली आहे. असे रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे. दरम्यान नेताजींच्या जयंतीदिनी २३ जानेवारीला होलोग्राम पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान मोदींच्या हस्ते केले जाणार आहे.

दरम्यान अमर जवान ज्योतीबाबत इंडिया गेटवर वाद सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली आहे. वास्तविक, सरकारने अमर जवान ज्योती राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या ज्योतीमध्ये विलीन करण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेससह अनेक विरोधी पक्ष केंद्र सरकारच्या या निर्णयाला विरोध करत आहेत.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!