टीम महाराष्ट्र देशा : राज्यातील गढ किल्यांवर खासगी विकसकांना हॉटेल्स आणि रिसॉर्ट उभारण्यास परवानगी देण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून २५ किल्ल्यांची यादी तयार करण्यात आली आहे. राज्य मंत्रीमंडळाडून ३ सप्टेंबर रोजी नव्या धोरणाला संमती दिली होती. त्यामुळे आता एमटीडीसी राज्य सरकारच्या मालकीचे किल्ले करारावर देऊ शकते. यावर अनेक नेत्यांनी संतापजनक प्रतिक्रिया दिली आहे. तर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संतप्त शब्दात सरकारला इशारा दिला आहे.
राज्यातल्या गड किल्ल्यांना हात लावायची हिंमतही करू नका. तसे केल्यास महाराष्ट्रातले इतिहासप्रेमी, दुर्गप्रेमी आणि शिवप्रेमी हे सहन करणार नाहीत. सरकारला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. सरकारला जर उत्पन्नच हवे असेल तर त्यांनी मंत्र्यांचे बंगले भाड्याने द्यावे, असे राज ठाकरे म्हणाले. सरकारच्या या धक्कादायक निर्णयानंतर विरोधकांनी फडणवीस सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. तर अनेक शिवप्रेमींनी याबाबत संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान राज्यात वर्ग 1 आणि वर्ग 2 असे दोन प्रकारचे किल्ले आहेत. महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित आणि अन्य ऐतिहासिक संदर्भ असलेले किल्ले हे वर्ग 1 मध्ये येतात आणि अन्य सुमारे 300 किल्ले हे वर्ग 2 मध्ये येतात. वर्ग 1 चे किल्ले हे संरक्षित वर्गवारीत येतात. केंद्र आणि राज्य सरकारचा पुरातत्त्व विभाग या किल्ल्यांच्या संवर्धनाचे काम करीत आहे आणि त्या किल्ल्यांच्या विकासाचा स्वतंत्र कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे.
- सालकऱ्याचा मुलगा निवडायचा की मालक तुम्हीच ठरवा’ राम शिंदेंचे भावनिक आवाहन
- कोकणात राष्ट्रवादीला खिंडार, ‘या’ नेत्याचा शिवसेना प्रवेश झाला निश्चित
- घरकुल घोटाळा : सुरेश जैन, गुलाबराव देवकर यांची कारागृहात रवानगी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
