Share

कर्जासाठी आर्थिक गळचेपी करून इतरांना पक्षात घेतले जात आहे : सुशीलकुमार शिंदे

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या जोरदार पक्षांतर सुरु आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे नेते भाजप आणि शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत. त्यामुळे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची अवस्था ही दयनीय झाली आहे. या पक्षांतरावरून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मोठ विधान केले आहे.

सोलापूरमध्ये बोलताना शिंदे यांनी ‘साखर कारखानदारांची अडचण केली जात आहे. त्यांची कर्जे नियमित करण्याची आशा दाखवून त्यांना भाजप प्रवेश दिला जात आहे. हे स्वमर्जीने जात आहेत असं नाही. त्यांच्या अडचणीमुळे काहीजण पक्षांतर करीत आहेत. पण ते जास्त काळ टिकणार नाही’ अस विधान केले आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी तत्कालीन विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. तसेच आताही कॉंग्रेस आणि भाजपचे अनेक नेते भाजप आणि सेनेच्या वाटेवर आहेत. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आघाडीसाठी ही धोक्याची घंटा आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!