🕒 1 min read
मुंबई: शिवसेनेशी बंड करत एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या सहकार्याने राज्यात सत्ता स्थापन केली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भविष्यात पुन्हा एकत्र येणार का, याबाबत साशंकता असताना शिंदे गटातील सांगोल्याचे बंडखोर आमदार शहाजीबापू भोसले-पाटील (Shahjibapu Bhosle Patil) यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
“एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी २५ वर्ष एकत्र काम केलं असून ते एकमेकांचे शत्रू नाहीत. आताचा निर्णय हा परिस्थितीचा असून सत्तेचा नाही. उद्धव ठाकरे टप्प्या टप्प्याने विचार करुन भविष्यात शिवसेना एकजुटीने काम करताना दिसतील.”, असे शहाजीबापू भोसले-पाटील यांनी म्हटले आहे.
तसेच ते पुढे म्हणाले कि, “उद्धव ठाकरे, रश्मी वहिनी आणि आदित्य ठाकरे सर्व आमदारांच्या मनात आहेत. सर्व आमदारांना शिंदे आणि ठाकरे यांनी एकत्र यावं असं १०० टक्के वाटतं. तसेच आम्ही कालही शिवसेनेत होतो आणि उद्याही राहणार. काही महिन्यांत जनता शिंदेंच्या नेतृत्वावर नक्कीच शिक्कामोर्तब करेल.”
महत्वाच्या बातम्या:
- Nilesh Rane :”दीपक केसरकर लिमिटमध्ये राहा…”, ‘त्या’ वक्तव्यानंतर निलेश राणेंचा इशारा
- IND vs ENG : भारतासाठी वनडे क्रिकेटमध्ये मोहम्मद शमीच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद; पाहा VIDEO!
- Amol Mitkari : “उगाच आम्हाला तोंड उघडायला लाऊ नका, हवेतून खाली या”; अमोल मिटकरींनी केसरकरांना सुनावलं!
- Eknath Shinde । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आनंद दिघे यांच्या स्मृतींना अभिवादन
- Jitendra Awhad : “जिथे आहात तिथे सुखी राहा, खाजवून खरूज…”; जितेंद्र आव्हाडांचा केसरकरांना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
